कोविड महामारी अचानक आली, वेगाने पसरली आणि जगभरातील लाखो लोकांचा या संसर्गजन्य आजाराने बळी घेतला. तेव्हापासून लोकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. असे म्हणणे योग्य राहील की, बहुतेक लोक भविष्यात मोठ्या संसर्गजन्य रोगाच्या उद्भवण्याबद्दल चिंताग्रस्त आहेत. ते विषाणू, जीवाणू, बुरशी किंवा परजीवी काहीही असू शकतात. सार्वजनिक आरोग्य अधिकाऱ्यांना सर्वात जास्त चिंता निर्माण करणारे तीन संसर्गजन्य रोग सांगितले आहेत, ते म्हणजे मलेरिया, एचआयव्ही आणि क्षयरोग. या आजारांमुळे दरवर्षी सुमारे दोन दशलक्ष लोक मारले जातात. मात्र, आता वैज्ञानिकांनी ज्या आजाराविषयी चिंता व्यक्त केली आहे, तो आजार आहे बर्ड फ्लू. या आजाराचे संकट संपूर्ण जगासमोर आहे. एवियन इन्फ्लूएंजा बर्ड फ्लू आता पक्ष्यांपर्यंत मर्यादित राहिला नसून जनावरे आणि माणसांनाही संक्रमित करत आहे. या उद्रेकामागील कारण काय? हे संकट जागासाठी किती मोठे? यामुळे महामारीसारखी परिस्थिती निर्माण होणार का? त्याविषयी जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा