भारत हा प्राचीन काळापासून सुजलाम-सुफलाम देश आहे. ‘जिस डाल डाल पे, सोने की चिडिया करती है बसेरा’ अशी या देशाची ख्याती. या भूमीने अनेक संस्कृतींना आपल्यात सामावून घेतले, त्यांचे भरणं पोषण केले. यातील काही कृतज्ञ होते, तर काही कृतघ्न निघाले. ज्या भूमीच्या उरावर लोणी चाखायला आले, त्याच मातेच्या गर्भात खंजीर खुपसले. कित्येक शतकं तिचा गर्भ रक्त सांडत राहिला. तिच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगली गेली. हे घडत होतं, उघड्या डोळ्यांनी बघितलं जात होत. पण क्रांती मात्र घडत नव्हती. याच अन्यायाविरुद्ध एक धगधगती ज्वाला पेटली. एका मातेची हाक दुसऱ्या मातेने ऐकली. जिजाऊंनी आपल्या रक्ताने या भूमीच्या रक्षणाचा विडा उचलला. आणि त्याचीच परिणती म्हणून आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षराने कोरला गेला. महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासात हा दिवस अजरामर झाला. त्यानंतर ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला किल्ले रायगडावर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. त्याच दिवसाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या राजधानीसाठी राजगडाचा त्याग करून रायगडाची निवड केली, महाराजांनी असे का केले हे आजच्या दिवसाच्या निमित्ताने जाणून घेणे समयोचित ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा