सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फूट उंच पुतळा कोसळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, आता याच पुतळ्यावरून आणखी एक नवा वाद सुरू झाला आहे. कोसळलेल्या पुतळ्याच्या कपाळावरील एका जखमेच्या खुणेने राज्यातील राजकारणी आणि इतिहासकारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. २५ ऑगस्ट रोजी ३५ फूट उंचीचा पुतळा कोसळल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणात गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनी बांधकामाचा दर्जा आणि पुतळा तयार करणार्या अननुभवी २४ वर्षीय शिल्पकार जयदीप आपटे यांना नियुक्त करण्याच्या निर्णयावर सरकारवर हल्ला चढवला आहे. मात्र, आता आणखी एक वाद निर्माण होत आहे. शिवरायांच्या कपाळाच्या डाव्या बाजूला एक जखमेची खूण दाखवण्यात आल्यावरून या वादाची सुरुवात झाली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा