बॅटमिंटन हा कमी साहित्यात खेळाला जाणारा खेळ आहे. कुणालाही खेळता यावे असा खेळ, अशी या खेळाची ख्याती आहे. नंदू नाटेकर, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद, सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, किदाम्बी श्रीकांत, सय्यद मोदी, पारुपल्ली कश्यप, अपर्णा पोपट, ज्वाला गुट्टा या काही भारतीय नामवंत बॅटमिंटनपटूंनी या खेळावर आपली मोहोर उमटवली आहे. प्रत्येक खेळासाठी नियम असतात तसेच या खेळालाही आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही संस्था या खेळाच्या नियमांवर नियंत्रण ठेवून असते. नियमबदल करण्याचे अधिकारही त्यांच्याचकडे आहेत. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने (BWF) आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये ‘स्पिन सर्व्ह’ वर तात्पुरती बंदी घातली आहे. या ‘स्पिन सर्व्ह’ साठी शटलकॉक हे अंगठा आणि मधल्या बोटामध्ये धरून ते सर्व्ह करण्यासाठी फिरवावे लागते. या पद्धतीत शटलकॉक नेटच्या जवळ पडत असल्याने ते परतवणे कठीण जाते त्यामुळे ही बंदी घालण्यात आली आहे. त्यांनी घेतलेला हा निर्णय क्रीडाक्षेत्रात सध्या चर्चेचा ठरलेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर बॅटमिंटन व त्याचे भारताशी असणारे नाते जाणून घेणे रंजक ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा