पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना मंगळवारी (३ ऑक्टोबर) पत्र लिहून राज्यावरील वाढते कर्ज फेडण्यासाठी पाच वर्षांची तात्पुरती स्थगिती देण्याबाबत केंद्राला आवाहन करावे, अशी मागणी केली. यंदाचे आर्थिक वर्ष संपण्यापर्यंत हे कर्ज तीन लाख २७ हजारांपर्यंत पोहोचणार आहे. “पंजाबच्या हितासाठी मी आपल्याला आग्रह करत आहे की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती करावी आणि राज्यावरील कर्जाची परतफेड करण्यासाठी किमान पाच वर्षांची तात्पुरती स्थगिती देण्यास सांगावे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक स्थितीवर आलेला ताण काही अंशी कमी होईल आणि तुमच्या (राज्यपालांच्या) सरकारला आर्थिक विकासाचा वेग वाढविण्याची काही प्रमाणात संधी मिळेल, अशी मागणी मुख्यमंत्री मान यांनी पत्राद्वारे केली. पंजाबची आर्थिक स्थिती बिकट कशी झाली? पंजाबला यातून बाहेर पडण्यासाठी काय मदत हवी? यासंबंधी घेतलेला आढावा…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा