आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी असो वा विरोधी पक्षांची इंडिया आघाडी, जागावाटपाची चर्चा सुरू आहे. कोणाच्या वाट्याला किती जागा येणार, हे निश्चित होत नाही. दबावतंत्राचे राजकारण जोरात चाललेय. दिल्ली आणि पंजाबसाठी काँग्रेस तसेच आम आदमी पक्षात जागावाटपाची बोलणी झाली. यातून भाजप सावध झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेना तसेच संयुक्त जनता दल हे दोन महत्त्वाचे पक्ष विरोधकांच्या गोटात दाखल झालेत. त्यामुळे भाजपला मित्रपक्षांची गरज आहे. यामुळेच पंजाबमधील एके काळचा सर्वात जुना मित्र अकाली दल तसेच दक्षिणेत तेलुगू देसम यांचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीत प्रवेश होणार काय, हा मुद्दा चर्चेत दिसतो. या दोन्ही राज्यांमधील राजकीय समीकरणे पाहता भाजपवर आघाडीसाठी दबाव आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा