बँकांपुढील तरलतेचे संकट काय?
देशाच्या बँकिंग व्यवस्थेतील तरलता अर्थात बँकांकडील रोख स्वरूपातील पैसा जवळपास १५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर घसरल्याची स्थिती जानेवारीमध्ये होती. बँकांना त्यांचे कर्ज व्यवहार पूर्ण करण्यासाठी पैसा हवा असतो, शिवाय तो अधिकाधिक स्वस्त मार्गाने अर्थात बचत व चालू खात्यातील ठेवींमधून मिळेल असा त्यांचा प्रयत्न असतो. पण नेमके त्याच आघाडीवर चित्र फारसे उत्साहदायी नाही. तेव्हा अशा स्थितीत बँका रिझर्व्ह बँकेकडून अल्पमुदतीत उसनवारी करतात. पण ही उसनवारी एका विशिष्ट मर्यादेतच असते. तथापि २३ जानेवारी रोजी बँकांद्वारे रिझर्व्ह बँकेकडून घेतल्या जाणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाचे प्रमाण ३.३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. हे कर्ज अर्थातच बँकिंग व्यवस्थेतील तरलतेतील तूट म्हणून मोजले जाते. यापूर्वी बँकिंग व्यवस्थेत इतकी मोठी तरलतेतील तूट ही एप्रिल २०१० मध्ये म्हणजेच १५ वर्षांपूर्वी दिसून आली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा