जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून जगभरातील शेती व्यवसायासमोर गंभीर संकटे उभी ठाकली आहेत. त्यामुळे जगाला भूकमुक्त करण्यासाठी शेती पद्धतीत बदलाची चर्चा जगभर सुरू आहे, त्या विषयी…

जगातील शेती व्यवसायासमोरील आव्हाने काय?

जागतिक तापमान वाढीचा परिणाम म्हणून नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झाली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, पूर, महापूर, गारपीट, वादळे, उष्णतेच्या लाटा अति थंडीमुळे शेतीची उत्पादकता मोठ्या प्रमाणावर घटली आहे. जगाच्या पाठीवर सर्वत्र शेतीमालाच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून जगभरात शेतीमालाला चांगला दर मिळावा म्हणून आंदोलने होताना दिसत आहेत. आफ्रिकेतील अनेक देशांप्रमाणेच चीन, युरोप, अमेरिका, पाकिस्तानसारख्या अनेक देशांना दुष्काळ आणि उन्हाच्या झळांसारख्या नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागत आहे.

Dombivli Datta Nagar Fish Market news in update in marathi
डोंबिवलीतील दत्तनगरमधील मासळी बाजारामुळे वाहतूक कोंडी; मासळी बाजाराच्या स्थलांतराची नागरिकांची मागणी
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Effects of climate change on agriculture Global warming Cyclone
शेतकऱ्याच्या अनुभवांचे बोल मोलाचे!
Nitrate levels in groundwater are increasing in seven districts of Maharashtra What are the risks print exp
महाराष्ट्रातील सात जिल्ह्यांत भूजलात नायट्रेटचे वाढते प्रमाण? कोणते धोके? 
Shetkari sangharsh samiti demands cancellation of Pune-Nashik Industrial Expressway pune
पुणे- नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्ग रद्द करावा; शेतकरी संघर्ष समितीची मागणी
banana marathi news
लोकशिवार : केळी पिकाला रोगांचा विळखा
climate change loksatta
कुतूहल : भूजल आणि हवामानबदल
2015 to 2024 the ten warmest years essential to bring annual warming below a degree
२०१५-२०२४ ठरले आजवरचे सर्वाधिक उष्ण दशक… वार्षिक तापमानवाढ १.५ डिग्रीच्या खाली आणणे अत्यावश्यक का?

हेही वाचा – विश्लेषण : चीनचे दोलायमान गृहनिर्माण क्षेत्र जगाला आर्थिक अडचणीत आणणार का? ‘एव्हरग्रांद’ प्रकरण काय आहे?

शाश्वत विकासाच्या मार्गावरून जग भरकटले?

शाश्वत विकासाची ध्येये निश्चित करून आठ वर्षे उलटून गेली आहेत. तरीही शाश्वत उद्दिष्टे गाठण्यासाठी खूप मोठा पल्ला गाठावयाचा आहे. अन्न आणि शेती उत्पादनांबाबत निश्चित करण्यात आलेली उद्दिष्टेही मागे पडली आहेत. शाश्वत विकास उद्दिष्टे २०२३, या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्राच्या वतीने आपल्या विविध विभागांकडून आढावा घेतला जात आहे. त्यानुसार, अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) वतीने जगाला भूक मुक्त करण्यासाठी ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह ऑन फूड सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ योजना शिखर परिषदेत सादर केली जाणार आहे. सर्वांना पोषणयुक्त आहार मिळेल, यासाठी अन्य शाश्वत उद्दिष्टे आणि शेतीमालाच्या उद्दिष्टांमध्ये समन्वय साधला जाणार आहे. शेती क्षेत्राच्या माध्यमातून होणारी पर्यावरणाची हानीही रोखली जाणार आहे. विशेषकरून शेती पद्धती आणि खाद्य प्रणालीत समन्वय साधला जाणार आहे.

भूकमुक्त जगाचे स्वप्न साध्य होणार?

भूकमुक्त जगाची शाश्वत उद्दिष्टे साध्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या वतीने विविध पातळ्यांवर प्रयत्न केले गेले. त्यानंतरही २०२२ मध्ये जगातील सुमारे ७३.५ कोटी लोकांना पोटभर अन्न मिळविण्यासाठी कसरत करावी लागली. ३१० कोटी लोकसंख्येला पौष्टिक अन्न मिळाले नाही. आशिया आणि दक्षिण अमेरिकेत भूक मुक्तीसाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना चांगले यश मिळाले आहे. पण, अन्य जगात ही स्थिती दिसली नाही. आफ्रिका, पश्चिम आशिया आणि कॅरेबियन देशात उपासमारीची स्थिती अधिक गंभीर झाली आहे. संबंधित देशांतील ६० कोटी लोकांना पोटभर अन्नासाठी वणवण करावी लागली, असे एफओएचा अहवाल सांगतो. एफएओचे महासंचालक क्यू डोंग्यू म्हणाले, की शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये अन्नधान्यांना मध्यवर्ती स्थान आहे. सर्वाधिक उत्पादन, पोषण, पर्यावरण आणि लोकांच्या जीवनमानाची गुणवत्ता सुधारण्यासाठी जगभरातील अन्नधान्य उत्पादन प्रणालीत बदल करण्याची गरज आहे. त्याशिवाय जगाला भूक मुक्त करणे शक्य नाही आणि जगाला भूक मुक्त केल्याशिवाय शाश्वत विकास उद्दिष्टे गाठणे शक्य नाही.

जागतिक कृषी पद्धतीत बदल होणार?

कृषी पद्धतीत बदल करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. केलेल्या आर्थिक गुंतवणुकीची जोखमी व्यवस्थापन अधिक सक्षमपणे करणे तसेच स्थानिक पातळीवरील हवामान बदलानुसार जगभरातील कृषी पद्धतीत स्थानिक गरजांनुसार बदल करण्याची गरज आहे. त्या शिवाय जागतिक कृषी पद्धतीत बदलाची प्रक्रिया पूर्ण होईल. जगभरातील पीक पद्धतीत बदल करण्यासाठी २०३० पर्यंत एकूण ४० लाख कोटी डॉलरची गरज आहे किंवा दरवर्षी सुमारे ६८,००० कोटी रुपयांची गरज आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक करण्याचे आव्हान जगासमोर आहे. एफएओच्या नेतृत्वाखालील ‘हाय इम्पॅक्ट इनिशिएटिव्ह ऑन फूड सिस्टम ट्रान्सफॉर्मेशन’ योजना इंटरनॅशनल फंड फॉर ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट (आईएफएडी) आणि वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) यांच्या मदतीने संयुक्त राष्ट्र औद्योगिक विकास संघटना (यूएनआईडीएओ) आणि संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (यूनेप) सारख्या संघटनांनी एकत्रित येऊन केला जावा, असाही आग्रह एफएओने धरला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : महारेराचा विकासकांवर वचक आहे का? आतापर्यंतच्या कारवायांनी नेमके काय साधले?

जगभरात काय प्रयत्न सुरू आहेत?

पाण्याचा ताण म्हणजे पाण्याची टंचाई सहन करणारे, अति थंडी आणि अति उष्णता, उष्णतेच्या झळांचा उत्पादनावर कमीत कमी परिणाम होईल, अशा अन्नधान्य, तेलबिया, कडधान्ये, फळे आणि भाजीपाल्याच्या सुधारित जाती विकसित करण्यावर जगभरात भर दिला जात आहे. त्या दिशेने संशोधन सुरू आहे. मक्याचा स्टार्च वापरून पिके पाण्याचा ताण सहन करू शकतील, या बाबतचे संशोधन भाभा अणु संशोधन केंद्र आणि राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये झालेले आहे. पंजाब कृषी विद्यापीठाच्या संशोधकांनी गव्हाचे पीबीडब्ल्यू आरएस १ एक नवे वाण विकसित केले आहे. या वाणाच्या गव्हात उच्च पातळीचे एमाइलोज स्टार्च आहे. त्यामुळे हा गहू टाइप दोन मधुमेह आणि कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज म्हणजे हृदय, रक्तवाहिन्यासंबंधी रोग, अवयवांचे नुकसान होण्याचा धोका कमी करतो. लठ्ठपणाच्या जागतिक समस्येला सामोरे जाण्यासाठी हे गव्हाचे वाण फायदेशीर ठरेल, असा संशोधकांचा दावा आहे. अशाच प्रकारे जागतिक समस्यांवर उपाय शोधणारे संशोधन जगभरात होत आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

Story img Loader