बहुप्रतीक्षित बॉर्डर-गावस्कर करंडकासाठीच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला २२ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्याआधीच भारतासमोर काही पेच निर्माण झाले आहेत. कर्णधार रोहित शर्माला काही दिवसांपूर्वीच अपत्यप्राप्ती झाल्यामुळे त्याने आणखी काही काळ मायदेशात थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पर्थ येथे होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराला नेतृत्वाची धुरा सांभाळावी लागणार आहे. बुमराला कर्णधारपदाचा कितपत अनुभव आहे, तसेच या अतिरिक्त भाराचा त्याच्या गोलंदाजीवर परिणाम होऊ शकतो का, याचा आढावा.

कर्णधारपदासाठी बुमरा योग्य का?

२०१८ साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या बुमराने फार कमी कालावधीत आपले वेगळेपण सिद्ध केले. क्रिकेटच्या तिन्ही प्रारूपांत मिळून विश्वातील सर्वोत्तम गोलंदाज असा लौकिक त्याने मिळवला. त्यामुळे साहजिकच संघातील अन्य खेळाडूंमध्ये त्याच्याविषयी वेगळा आदर निर्माण झाला. खूप विचारी आणि हुशार गोलंदाज म्हणून बुमरा ओळखला जातो. तसेच मैदानावर तो युवा खेळाडूंना, विशेषत: वेगवान गोलंदाजांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळेच तो कर्णधारपदासाठी योग्य उमेदवार असल्याचे निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाला वाटले.

Jos Buttler Takes Dig at India After Pune Concussion Substitue of Harshit Rana in IND vs ENG
IND vs ENG: जोस बटलरने नाणेफेकीदरम्यान भारताला लगावला सणसणीत टोला, हर्षित राणाच्या मुद्द्यावरून पुन्हा सुनावलं
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
IND vs ENG Tilak Varma reveals why he targeted England best bowler Jofra Archer in Chepauk T20I Match
IND vs ENG : तिलक वर्माने जोफ्रा आर्चरला का केलं होतं लक्ष्य? सामन्यानंतर स्वत:च केला खुलासा; म्हणाला, ‘जेव्हा विकेट…’
IND vs ENG Jos Buttler becomes first player to score 600 runs in T20 cricket against India
IND vs ENG : जोस बटलरचा भारताविरुद्ध मोठा पराक्रम! टी-२० क्रिकेटमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू
IND vs ENG Harry Brook Clean Bowled on Varun Chakravarthy in 2nd T20I Despite no Smog
IND vs ENG: “बघ धुकं आहे का?”, हॅरी ब्रुक वरूणच्या गोलंदाजीवर पुन्हा क्लीन बोल्ड, विकेट पाहून झाला चकित; VIDEO व्हायरल
Why did Arshdeep apologize to Yuzvendra Chahal after IND vs ENG 1st T20I BCCI shared video
IND vs ENG : ‘सॉरी युझी भाई…’, इंग्लंडविरुद्धच्या सामन्यानंतर अर्शदीप सिंगने का मागितली चहलची माफी? पाहा VIDEO
IND vs ENG Suryakumar Yadav shed light on the situation, revealing that the exclusion of Mohammed Shami was purely a tactical decision
IND vs ENG : मोहम्मद शमी फिट की अनफिट? पहिल्या सामन्यातून वगळण्याबाबत सूर्यकुमार यादवने केला खुलासा
Sanju Samson Scored 22 Runs in an Over Against Gus Atkinson Hit 5 Boundaries Watch Video
IND vs ENG: ४,४,६,४,४ संजू सॅमसनने इंग्लंडच्या हॅटट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाची केली धुलाई; एका षटकात कुटल्या २२ धावा

हेही वाचा >>>Vir Das post: भारतीय शास्त्रज्ञ अमेरिकेत चालवतोय टॅक्सी? काय नेमकं घडलं?

कर्णधारपदाचा अनुभव…

बुमराने आतापर्यंत केवळ एक कसोटी आणि दोन ट्वेन्टी-२० सामन्यांत भारताचे नेतृत्व केले आहे. २०२२ मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटीत बुमराला सर्वप्रथम कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळाली. त्यामुळे तो कपिलदेव यांच्यानंतर भारताचे नेतृत्व करणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला होता. परंतु, आपल्या कर्णधारपदाच्या पदार्पणात बुमराला हार पत्करावी लागली होती. ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये मात्र बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने आयर्लंडविरुद्ध तीन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली होती. या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता.

कर्णधारपदाच्या पदार्पणात काय घडले?

भारतीय संघ २०२१ मध्ये इंग्लंडच्या दौऱ्यावर होता. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका नियोजित होती. यापैकी चार सामने ठरल्याप्रमाणे झाले, ज्यात भारताने २-१ अशी आघाडी मिळवली होती. पाचव्या कसोटीपूर्वी भारतीय संघातील काही सदस्यांना करोनाची बाधा झाली. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. हा निर्णायक सामना पुढील वर्षी म्हणजेच २०२२ मध्ये खेळविण्यात आला. बर्मिंगहॅम येथे झालेल्या या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहितला करोनाची बाधा झाली. त्यामुळे त्याला या कसोटीला मुकावे लागले आणि बुमराने नेतृत्वाची धुरा सांभाळली. या सामन्यात इंग्लंडने भारतावर सात गडी राखून मात केली होती. भारताने इंग्लंडसमोर चौथ्या डावात ३७८ धावांचे अवघड आव्हान ठेवले होते. मात्र, जो रूट (नाबाद १४२) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ११४) यांना रोखण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. त्यामुळे इंग्लंडला हा सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधता आली. या सामन्यात बुमराचे काही निर्णय प्रश्न उपस्थित करणारे ठरले होते. त्याला गोलंदाजांचा योग्य वापर करता आला नाही, तसेच इंग्लंडच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा अवलंबल्यानंतर बुमरा थोडा गोंधळला आणि कर्णधार म्हणून पर्यायी योजना शोधण्यात तो कमी पडल्याचे म्हटले गेले. या अनुभवातून तो कितपत शिकला हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा >>>निवडणुकीत धारावी पुनर्विकासाचा मुद्दा का गाजतोय? अदानींवरून दावे-प्रतिदावे का?

अतिरिक्त भाराचा गोलंदाजीवर परिणाम?

कर्णधारपदाच्या पदार्पणात बुमराला हार पत्करावी लागली असली, तरी त्याची वैयक्तिक कामगिरी समाधानकारक होती. त्याने दोन डावांत मिळून पाच गडी बाद केले होते. तसेच फलंदाजीत चमक दाखवताना स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात ३५ धावा काढत कसोटी क्रिकेटमध्ये नवा विक्रम प्रस्थापित केला होता. फलंदाजीत बुमराकडून पुन्हा अशी कामगिरी अपेक्षित नाही, पण गोलंदाजीत भारताची भिस्त त्याच्यावरच असणार आहे. विशेषत: मोहम्मद शमीच्या अनुपस्थितीत बुमरावरील जबाबदारी अधिकच वाढली आहे. सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकायची झाल्यास भारतासाठी बुमराने लौकिकाला साजेशी कामगिरी करणे आवश्यक आहे. कर्णधारपदाच्या जबाबदारीमुळे त्याला केवळ वैयक्तिक कामगिरीचा नव्हे, तर संपूर्ण संघाचा विचार करावा लागेल. त्यामुळे मानसिकदृष्ट्या त्याचा निश्चितपणे कस लागणार आहे.

बुमरासाठी मोठी संधी…

वेगवान गोलंदाज चांगले कर्णधार होऊ शकत नाहीत असा क्रिकेटविश्वात समज आहे. मात्र, तो चुकीचा असल्याचे कपिल देव, पाकिस्तानचे इम्रान खान आणि अलीकडच्या काळात ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांनी दाखवून दिले आहे. आता बुमराकडेसुद्धा ही संधी आहे. तसेच ३७ वर्षीय रोहित शर्मा आणखी किती काळ कसोटी क्रिकेट खेळणार, हे निश्चित नाही. या परिस्थितीत भारताला आता भविष्याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे पर्थ कसोटीत यशस्वी कामगिरी करून पुढील पूर्णवेळ कर्णधार म्हणून आपणच योग्य उमेदवार असल्याचे दाखवून देण्याचीही बुमराकडे संधी आहे. ती तो साधतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Story img Loader