देश स्वतंत्र झाल्यानंतरही काही लढे दीर्घकाळ सुरू राहिले. त्यातील प्रामुख्याने नाव घ्यावा लागेल असा लढा म्हणजे महाराष्ट्र – कर्नाटक राज्याचा सीमा प्रश्न. पूर्वीचे म्हैसूर आणि नंतर कर्नाटक राज्याची निर्मिती करताना बेळगावसह बारा तालुक्यांतील ८५६ मराठी भाषक गावे या नव्या राज्यात घुसडण्यात आली. लोकमताचा अनादर करून कर्नाटकात गावांचे विलीनीकरण करण्यात आल्याने अवघ्या सीमाभागात संतापाची लाट उसळली. अत्यंत त्वेषाने मराठी भाषकांनी विरोधाचा आवाज बुलंद केला. आंदोलनांची मालिकाच सुरू झाली. कर्नाटक शासनाने वेळोवेळी दडपशाहीचे धोरण अंगिकारले. आंदोलनकर्त्या मराठी भाषकांवर गोळीबार केला. काहीजण हुतात्मे झाले. दडपशाहीला न जुमानता सहा दशकांहून अधिक काळ बेळगावसह सीमाभागातील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी आतुर असून त्यासाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा