भारतीय इतिहासाला एक अद्भुत वलय प्राप्त झाले आहे. कधी काळी भारताला ‘सोने की चिडियाँ’ असे म्हटले जात होते. भारतीय इतिहासात डोकावून पाहताना अगदी हडप्पा संस्कृतीच्या कालखंडापासून भारताने देशाबाहेरील आणि देशाअंतर्गत व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावली होती, असे लक्षात येते. कोणताही देश किंवा प्रांत असो स्थिर आणि भरभराटीला येणारी अर्थव्यवस्था ही त्या राष्ट्राचा कणा असते. म्हणूनच परकीय आक्रमकांच्या वाढत्या प्रभावापर्यंत भारताने नेहमीच व्यापारातील प्रगतीच्या आधारे अग्रभागी राहण्याचा मान मिळवला होता. मध्ययुगीन कालखंडातील अतिक्रमणाच्या लाटेत भारताने आपले बरेचसे वैभव गमावले. अशा परिस्थितीतही भारतीय पारंपरिक व्यवसाय भारताच्या समृद्धीत भरच घालत राहिले. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेवर शेवटचा घाला घालण्याचे काम ब्रिटिशांनी केले. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे भारताचा वस्त्रोद्योग; सुती कापडाच्या निर्मितीत भारत अग्रेसर होता. कधी काळी जगात सत्ता गाजवणाऱ्या या उद्योगाच्या प्रगतीला ब्रिटिश कालखंडात सुरुंग लावण्यात आला. आज जागतिक कॉटन डेच्या निमित्ताने ब्रिटिश कालखंडात भारतीय वस्त्रोद्योगाची अधोगती कशी झाली याचाच घेतलेला हा आढावा!
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा