सचिन दिवाण sachin.diwan@ expressindia.com

भारताने १९७४ साली राजस्थानमधील पोखरण येथे पहिला अणुस्फोट केल्यानंतर क्षेपणास्त्रे विकसित करणे हा त्यापुढील नैसर्गिक टप्पा होता. त्यानुसार १९८३ साली एकात्मिक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम (इंटिग्रेटेड गायडेड मिसाइल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) हाती घेण्यात आला. त्याअंतर्गत पृथ्वी, अग्नि, नाग, त्रिशूळ आणि आकाश ही क्षेपणास्त्रे विकसित करण्यात आली. त्यातील पृथ्वी हे पहिले यशस्वी क्षेपणास्त्र होते. तत्पूर्वी १९७० च्या दशकात भारताने प्रोजेक्ट डेव्हिल आणि प्रोजेक्ट व्हॅलियंट नावाच्या प्रकल्पांतून क्षेपणास्त्रे विकसित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश लाभले नव्हते.

95 percent of the country foreign trade is carried out through the coast print eco news
किनारपट्टीद्वारे देशाचा ९५ टक्के परराष्ट्र व्यापार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
ISRO satellite launch , Sriharikota, andhra pradesh, 100th successful flight,
ISRO satellite launch mission : इस्रोने श्रीहरीकोटामध्ये ठोकले दमदार शतक, शंभराव्या उड्डाणात ५४८ वा उपग्रह केला प्रक्षेपित
property tax defaulters in pune news in marathi
अभय योजनेचा फायदा घेणारेच झाले पुन्हा थकबाकीदार, नक्की प्रकार काय ?
DRDO scramjet test loksatta
डीआरडीओची स्क्रॅमजेट चाचणी काय होती? भारताची हायपरसॉनिक क्षेपणास्त्र क्षमता लवकरच अमेरिका, रशिया, चीनच्या तोडीची?
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
facilities for Shiv Jayanti festival Shivaji devotees pune Municipal Corporation
पुणे : शिवजयंती महोत्सवासाठी या सुविधा द्या, शिवभक्तांची महापालिकेकडे मागणी !
trouble for residents due to dust on cement roads in Dombivli
डोंबिवलीत सिमेंट रस्त्यांवरील धूळ उधळ्याने रहिवासी हैराण

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (डीआरडीओ) आणि भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) यांच्या संयुक्त प्रयत्नांतून पृथ्वीची निर्मिती झाली. पृथ्वी हे लघु पल्ल्याचे, जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे गायडेड क्षेपणास्त्र आहे. पृथ्वी क्षेपणास्त्र ५०० ते १००० किलो वजनाची पारंपरिक स्फोटके किंवा अण्वस्त्रे वाहून नेऊ शकते. त्याच्या पृथ्वी-१, पृथ्वी-२ आणि पृथ्वी-३ अशा आवृत्ती आहेत. त्यांचा पल्ला अनुक्रमे १५०, २५० आणि ३५० किमी इतका आहे. या आवृत्ती भूदल, हवाईदल आणि नौदलासाठी विकसित केल्या आहेत. पृथ्वीची सुरुवातीची आवृत्ती १९८८ साली तयार झाली आणि तिच्या विविध चाचण्या पार पडल्यानंतर हे क्षेपणास्त्र १९९४ साली सेनादलांत दाखल झाले. भारतीय सेनादलांच्या स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडकडून क्षेपणास्त्रांचे संचालन केले जाते.

पृथ्वी-१ आणि २ ही एकाच टप्प्याची (सिंगल स्टेज) आणि द्रवरूप इंधनावर आधारित क्षेपणास्त्रे असून त्यात स्ट्रॅप-ऑन इनर्शिअल गायडन्स सिस्टम वापरण्यात आली आहे, तर पृथ्वी-३ ही नौदलासाठीची आवृत्ती धनुष नावाने ओळखली जाते. हे दोन टप्प्यांचे क्षेपणास्त्र आहे. त्यातील पहिला टप्पा घनरूप, तर दुसरा द्रवरूप इंधनाचा आहे. त्याच्या आयएनएस सुभद्रा आणि राजपूत या नौकांवरून चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

पृथ्वी क्षेपणास्त्राने भारतीय सेनादलांना नवी मारकशक्ती प्रदान करून दिली असली तरी हे काही फार अत्याधुनिक क्षेपणास्त्र मानले जात नाही. त्याने भारताला क्षेपणास्त्राचे मूलभूत तंत्रज्ञान उपलब्ध झाले. पृथ्वी क्षेपणास्त्राची नेम चुकण्याची शक्यता (सक्र्युलर एरर प्रॉबेबिलिटी – सीईपी) १० ते ५० मीटर इतकी आहे. पृथ्वी क्षेपणास्त्रांमुळे भारतीय उपखंडात नव्याने शस्त्रस्पर्धा सुरू झाल्याचा आरोप केला जातो. त्यानंतर पाकिस्तानने चीन आणि उत्तर कोरियाच्या मदतीने क्षेपणास्त्रे मिळवली. पाकिस्तानची हत्फ मालिकेतील क्षेपणास्त्रे चीनच्या डाँग-फेंग (डीएफ) किंवा एम-११ या क्षेपणास्त्रांवर आधारित आहेत. हत्फ-१ क्षेपणास्त्रांचा पल्ला ७० ते १०० किमी आहे.

Story img Loader