भारतामध्ये देवाला सर्वोच्च स्थान दिले जाते. लोकांच्या भावना आणि श्रद्धा देवाशी निगडित असतात. देवावर विश्वास असणारे लोक कठीणातील कठीण नवस बोलतात आणि ते पूर्णही करतात. काही लोकांचे नवस ऐकल्यावर आपल्यालाही धक्का बसतो. अशाच एका भक्ताने मुंबईच्या प्रसिद्ध ‘लालबागचा राजा’कडे नवस केला होता. त्याचा नवस काय होता हे जाणून घेऊया.

या भक्ताचं नाव आहे समीर जगदीश दत्तानी. ४४ वर्षीय समीर गुजरातच्या जुनागड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी आपला नवस पूर्ण करण्यासाठी ७७० किलोमीटरचे अंतर २५ दिवसांमध्ये पूर्ण केले आहे. समीर काल ७ सप्टेंबरला मुंबईमध्ये पोहचले. त्यांनी १३ ऑगस्टला आपला प्रवास सुरु केला होता. तब्बल २५ दिवसांचा पायी प्रवास करून ते काल मुंबईमध्ये पोहचले आहेत. दत्तानी गुजरात बोर्ड मध्ये शिक्षण निरीक्षक आहेत.

What happens when you drink Clove lemon tea every day health news
दररोज एक कप लिंबू-लवंगयुक्त चहाचे सेवन करा अन् शरीरातील ‘हे’ बदल पाहा; तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
What Manoj Jarange Said?
Manoj Jarange : मनोज जरांगेंचं वक्तव्य, “धनंजय मुंडे रात्री दोन वाजता भेटले होते, वाल्मिक कराडही होता, सगळे पाया पडले आणि…”
gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Gulbadan Begum's Hajj Pilgrimage
Mughal History: गुलबदन बेगमची हजयात्रा: श्रद्धेचा व स्वातंत्र्याचा शोध, ही यात्रा का ठरली इस्लामिक साम्राज्याची ओळख?
Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh
Dhananjay Deshmukh : धनंजय देशमुख यांचा मोठा खुलासा, “त्यादिवशी आरोपी आणि एपीआयचं चहाचं बिल मीच दिलं, त्यानंतर त्याने…”
Mallikarjun Kharge Dubki Remark
Mallikarjun Kharge : “गंगेत डुबकी घेतल्याने गरिबी…”, मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानावरून नवा वाद; भाजपाने दिलं प्रत्युत्तर
makar Sankranti loksatta
काळाचे गणित : करी डळमळ भूमंडळ

Ganesh Visarjan 2022 : अनोख्या पद्धतीने दिला गेला आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप; भन्नाट टेक्नोलॉजी पाहून नेटकरीही पडले चाट

दत्तानी हे व्यवसायाने प्राथमिक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आहेत. नुकतीच बढती मिळाल्यानंतर ते आता गुजरात शिक्षण मंडळात शिक्षण निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. मिड-डे वृत्तपत्राशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की, ते लालबागचा राजाचे भक्त आहेत आणि गेल्या पाच वर्षांपासून ते सातत्याने मुंबईत येत आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत ते कोरोनाच्या साथीमुळे मुंबईला जाऊ शकले नाहीत.

दत्तानी म्हणाले, ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जेव्हा मी लोकांना समस्यांशी झुंजताना पाहिले, तेव्हा लोक औषधे आणि ऑक्सिजनच्या शोधात होते. मी तेव्हाच हे व्रत घेतले आणि ठरवले की जर गणेशाने करोना महामारी संपवली आणि लोकांचे जीवन पूर्वीप्रमाणेच रुळावर येऊ लागले तर मी लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी पायी चालत जाईन.’ आता परिस्थिती पूर्वपदावर आहे, त्यामुळेच ते आपला नवस पूर्ण करण्यासाठी गुजरातहून पायी निघाले.

रतन टाटा देवमाणूस! घरगुती गणपतीच्या लहानशा देखाव्यातून साकारली भव्य कलाकृती; पाहा Photos

दत्तानी म्हणाले, ते प्रवासादरम्यान दररोज ३० ते ३२ किमी चालायचे आणि रात्री विश्रांती घ्यायचे. १३ ऑगस्ट रोजी जुनागड येथून त्यांनी आपली यात्रा सुरू केली, ७४० किलोमीटरचा प्रवास करत ते काल मीरा रोडला पोहचले आणि संध्याकाळपर्यंत लालबागला पोहचले. त्यांनी सांगितले, २५ दिवस झाले तरी त्यांच्या समोर कोणतीही अडचण आली नाही. प्रवासादरम्यान लोकांनी त्यांना ठिकठिकाणी आदर दिला आणि प्रोत्साहन दिले, त्यांच्या राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था केली.

Story img Loader