आयपीएलच्या तेराव्या हंगामात प्ले-ऑफचं तिकीट मिळवलेल्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आपल्या धडाकेबाज कामगिरीचं सत्र सुरुच ठेवलं आहे. दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्सने दिल्लीविरुद्ध सामन्यात पहिल्यांदा गोलंदाजी करत दिल्लीच्या डावाला खिंडार पाडलं. ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कुल्टर-नाईट आणि चहर यांनी भेदक मारा करत दिल्लीच्या संघाला मोठी धावसंख्या गाठू दिली नाही.

जसप्रीत बुमराहने ४ षटकांत १७ धावा देत ३ बळी घेतले. याचसोबत अखेरचं षटक टाकताना बुमराहने रबाडाला धावबादही केलं. या कामगिरीच्या जोरावर आयपीएलमध्ये दिग्गज गोलंदाजांच्या पंगतीत बुमराहला स्थान मिळालं आहे. एका सामन्यात सर्वाधिकवेळा ३ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याची बुमराहची ही १३ वी वेळ ठरली आहे.

ऋषभ पंत, मार्कस स्टॉयनिस आणि हर्षल पटेल या ३ फलंदाजांना बुमराहने माघारी धाडलं.