आयपीएलच्या तेराव्या हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सच्या संघाने आपला धडाकेबाज फॉर्म कायम ठेवला आहे. अंतिम फेरीत दिल्ली कॅपिटल्सवर सहज मात करत मुंबईने ५ गडी राखून विजय मिळवत लागोपाठ दुसऱ्या विजेतेपदावर मोहर उमटवली. कर्णधार रोहित शर्माने मुंबई इंडियन्सच्या विजयात मोलाची भूमिका बजावत आपण फॉर्मात असल्याचं सिद्ध केलं. अंतिम फेरीत रोहितने ५१ चेंडूत ५ चौकार आणि ४ षटकारांसह त्याने ६८ धावा केल्या. अवश्य वाचा - .तर मुंबई इंडियन्सचा संघ टी-२० विश्वचषकही जिंकेल ! दुखापतीमुळे रोहितला यंदाच्या हंगामात फलंदाजीत कमाल दाखवता आलेली नसली तरीही कर्णधार म्हणून त्याने आपला प्रभाव पाडला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने रोहित शर्माकडे भारताच्या टी-२० संघाचं कर्णधारपद जायला हवं अशी मागणी केली आहे. टी-२० सामने कसे जिंकायचे हे रोहित शर्माला माहिती असल्याचं वॉनने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. Without question Rohit Sharma should be the Indian T20 captain .. fantastic man manager & leader .. & he knows exactly how to win T20 games .. it would also give Virat chance to take a breather and just be the player .. it’s works for all other teams around the world ..#IPL2020 — Michael Vaughan (@MichaelVaughan) November 10, 2020 रोहितकडे कर्णधारपद दिल्यास विराट कोहलीला एक खेळाडू म्हणून स्वतःकडे लक्ष देता येईल असंही वॉनने स्पष्ट केलंय. इतर देशांमध्ये हा फॉर्म्युला चांगला चालत असल्याचंही वॉनने म्हणलंय. अवश्य पाहा - सत्ता आमचीच ! मुंबईच्या या खेळाडूंनी गाजवलं यंदाचं IPL