कोल्हापूर: गडहिंग्लज येथील गोडसाखर नावाने ओळखल्या जाणाऱ्या साखर कारखान्यांमध्ये पुन्हा एकदा कडवटपणा निर्माण झाला आहे. प्रदेश जनता दलाचे अध्यक्ष श्रीपतराव शिंदे यांच्या कारभाराला कंटाळून १२ संचालकांनी शुक्रवारी राजीनामा दिला आहे. यामुळे कारखान्याचे भवितव्य पुन्हा एकदा टांगणीला लागले असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे आहे.

 अप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याच्यात आज  राजीनामा नाट्य रंगले. अध्यक्ष शिंदे यांनी स्वतःच्या राजकीय व आर्थिक स्वार्थासाठी कोणत्याही तयारीशिवाय कारखाना सुरू केला आहे असा गंभीर आरोप राजीनामा दिलेल्या 12 संचालकांनी पत्रकामध्ये केला आहे.

social security schemes are not free gifts jharkhand speaker mahato
उद्योगपतींना पायघड्या घालताना ‘रेवडी’चा विषय नाही
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Arvind Kejriwal rise in Indian politics
केजरीवाल यांचा भारतीय राजकारणात उदय कसा झाला? पहिल्या मोठ्या पराभवानंतर केजरीवाल राजकारणात कसे टिकणार?
Sanjay Raut On Congress Arvind Kejriwal
Sanjay Raut : “अरविंद केजरीवालांच्या पराभवाने काँग्रेसला आनंद झाला असेल तर…”, संजय राऊतांचं मोठं विधान
Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
congress state president nana patole calls mahayuti government corrupt
महायुतीचे सरकार भ्रष्ट, तीन पक्षांत मलई खाण्याची स्पर्धा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा घणाघात
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Bigg Boss 18 Fame Rajat Dalal talk about chahat pandey and controversy
Video: चाहत पांडेचं नाव ऐकताच रजत दलालने जोडले हात, विनंती करत म्हणाला…

  पत्रकात म्हटले आहे, कारखान्याच्या अध्यक्षांनी संचालकांना विश्वासात घेऊन कारखाना वेळाने सुरु करण्यातील फायदे तोटे विचारात घेऊन निर्णय घेणे गरजेचे होते. तसेच कारखान्याचा कारभार सर्व संचालक मंडळास विश्वासात न घेता एकतंत्री कारभारामुळे सर्व सभासद व कारखान्याचा फार मोठा आर्थिक तोटा होत आहे.  कारखान्याचे अध्यक्ष हे नेहमीच बेजबाबदार व मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता विश्वास राहिलेला नाही. शनिवारी परस्पर साखर विक्रीसाठी निर्णय घेतला असून ती  थांबविण्याबाबत कारखान्यास आदेश देण्याची मागणीही  साखर सहसंचालक यांच्याकडे कारखान्याच्या संचालक यांनी केली आहे .

डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, सतिश पाटील, विद्याधर गुरबे, दिपक जाधव, प्रकाश पताडे, अनंत कुलकर्णी, सुभाष शिंदे, सदानंद हत्तरकी, किरण पाटील, जयश्री पाटील, क्रांतीदेवी कुराडे यांचा राजीनामा दिलेल्यामध्ये समावेश आहे.

साखर विभागाचे आदेश लागु

प्रादेशिक साखर सहसंचालक एस एन जाधव यांनी याची तात्काळ दखल घेत कारखान्याला अधिकृत सभेच्या मंजुरीशिवाय कोणताही धोरणात्मक निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे.

Story img Loader