कोल्हापूर: संरक्षण बजेट हे देशाच्या सुरक्षिततेसाठीची गुंतवणूक असते. देश बळकट होण्यासाठी देशाच्या संरक्षणाला सर्वोच्च प्राधान्य हवे , असे प्रतिपादन भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी शुक्रवारी केले. ‘आशाये’ या ६५  व्या  रोटरी डिस्ट्रिक्ट ३१७० च्या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.  सिद्धगिरी मठाचे मठाधिपती पूज्यश्री अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी प्रमुख उपस्थित होते.

हेही वाचा >>> कोल्हापूर : पंचगंगा, भोगावती नद्यांवर उपसाबंदी लागू, शिरोळ तालुक्यात पंचगंगा कोरडी

Supreme Court directs Sahara Group to deposit Rs 1000 crore
सहारा समूहाला १,००० कोटी जमा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश; मुंबई जमीन विकसित करण्यासाठी संयुक्त भागीदारीस परवानगी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Sunil Ambekar clarified that the Rashtriya Swayamsevak Sangh is in favor of conducting a caste wise census
जातीनिहाय जनगणनेसाठी संघ अनुकूल; राजकारणासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
The responsibility of more than two lakh houses rests with Zopu Authority Mumbai news
दोन लाखाहून अधिक घरांची जबाबदारी झोपु प्राधिकरणावरच! अन्य प्राधिकरणांवर योजना पूर्ण करण्याची जबाबदारी
country economic planning in india constitution
संविधानभान : देशाचे आर्थिक नियोजन
UPSC lateral entry
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या थेट भरतीच्या निर्णयावरून एनडीएत मतभेत? कुणाचा पाठिंबा, तर कुणाचा विरोध; नेमकं काय घडलं?
karnataka high court relief siddaramaiah in land scam row
सिद्धरामय्या यांना न्यायालयाचा दिलासा; २९ ऑगस्टपर्यंत कारवाई न करण्याचे निर्देश

कोल्हापूर,सांगली रत्नागिरी,  सिंधुदुर्ग , सावंतवाडी, संपूर्ण गोवा याबरोबरच हुबळी, धारवाड बेळगाव या उत्तर कर्नाटक राज्यातील २ हजारहून अधिक रोटेरियन या परिषदेमध्ये सहभागी झाले आहेत. नरवणे पुढे म्हणाले,शांतता हवी असेल युद्धासाठी तयार रहा. पण त्यासाठी क्षमता तयार करणे हे मोठ्या नियोजनाचे काम आहे. वर्तमानात आणि भविष्यात आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत ,याचा विचार करायला हवाबाह्य जगातील धोक्याबरोबर अंतर्गत धोके सुद्धा तितकेच डोळसपणे पाहणे गरजेचे असते. किंबहुना अंतर्गत सुरक्षितते कडे ज्यादा लक्ष द्यायला हवे. जगात काय घडते ,याचा सुद्धा विचार करणे आवश्यक आहे. युवा पिढीने स्वतःची आवडीकडे लक्ष द्या. केवळ मेसेज फॉरवर्ड करण्यापेक्षा आपण जे करतो त्यातून संविधान जपतो का ?ते देशहिताचे आहे का ?हे पाहणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> कोल्हापुरात नृत्यनाट्य मधून शिवरायांचे प्रसंग साकारले; एशिया पॅसिफिक बुक ऑफ वर्ल्ड रेकोर्डमध्ये नोंद

अदृश्य काडसिद्धेशर स्वामी यांनी सांगितले की,  लोकांची सेवा करणे हे  व्रत रोटरीने जपले आहे. रोटरीचे सदस्य जगभर सेवाकार्य करत आहेत.कणेरी मठासाठी अनेक सुविधा रोटरीने उपलब्ध करून दिल्याबददल त्यांनी  कृतज्ञता व्यक्त केली.   रोटरीचे प्रांतपाल नासीर बोरसदवाला यांनी या परिषदेमुळे रोटरी सदस्यामध्ये संवाद आणि मैत्रीची भावना वाढण्यास निश्चित मदत होईल, असे नमूद केले. कॉन्फरन्स चेअरमन राजीव परीख यांनी परिषद आयोजनाची सविस्तर माहिती दिली. सचिव विक्रांत कदम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.यावेळी रोटरी इंटरनॅशनलचे प्रतिनिधी हेन्री टॅन (सिंगापूर) , रोटरी इंटरनॅशनल ग्रॅंट ऑफिसर रेबेका मेंडोजा (अमेरिका ), कॉन्फरन्स काऊन्सिलर वासुदेव देशींगकर, शरद पै, आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील , भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, सकिना बोरसादवाला , रोटरी मुव्हमेंट प्रेसिडेंट चंदन मिरजकर , ब्रम्हकुमारी परिवारातील आंतरराष्ट्रीय वक्त्या सुनिता दीदी, देशाचे माजी माहिती आयुक्त उदय माहुरकर तसेच संयोजन समितीचे राहुल कुलकर्णी, सचिन मालू, दिव्येश वसा, ऋषिकेश खोत , दिलीप शेवाळे ,डॉ.महादेव नरके  उपस्थित होते.कॉन्फरन्स सचिव प्रसन्न देशिगकर यांनी आभार मानले. उद्घाटन कार्यक्रमानंतर प्रसिद्ध आवाजाचे जादूगार चेतन सशीतल यांनी आपल्या आवाजाच्या कलेने सर्वांना मंत्रमुग्ध केले.