कोल्हापूर : इचलकरंजी शहराच्या सर्वांगिण विकासाच्या गप्पा मारणार्या खासदार आणि आमदारांनी शहरातील कार्यक्षम अधिकार्यांच्या बदल्यांचा खेळखंडोबा लावला आहे. खासदार धैर्यशील माने यांनी पहिले आयुक्त सुधाकर देशमुख यांची तर आमदार प्रकाश आवाडे यांनी ओमप्रकाश दिवटे यांची बदली केली आहे. स्वत:च्या स्वार्थासाठी बेकायदेशीर कामांना विरोध करणार्या अधिकार्यांच्या बदल्यांचे वास्तव चित्र जनता उघड्या डोळ्यांनी पाहत असून त्याचे उत्तर जनता दिल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप मँचेस्टर आघाडीचे सागर चाळके व प्रकाश मोरबाळे यांनी पत्रकारांशी बोलताना केला.अकरा महिन्यांपूर्वी महापालिकेत आयुक्त म्हणून आलेल्या ओमप्रकाश दिवटे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. शहराचे आमदार प्रकाश आवाडे यांच्या काही कामांना त्यांनी स्पष्टपणे नकार दर्शविल्याने त्यांच्या बदलीचा घाट आवाडेंनी घातला होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा