इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयात शुक्रवारी धार्मिक पेहराव करुन महाविद्यालयात येणार्‍यावरुन वादाचा प्रसंग घडला. त्यातून मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काही काळ तणाव पसरला. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत या आठवड्यात दुसऱ्यांदा धार्मिक मुद्द्यावरून वादाचा प्रसंग उद्भवला .  

हेही वाचा >>> कोल्हापूरला पावसाने झोडपले; ४५ बंधारे पाण्याखाली

Vaishnavi Bavaskar, Deputy Collector,
‘यश हवे तर आत्मपरीक्षण करून स्वत:चे बलस्थान आणि उणिवा ओळखा’, उपजिल्हाधिकारी झालेल्या वैष्णवीचा सल्ला
Daily Horoscope 12th October 2024 Rashibhavishya in Marathi | dasara 2024
१२ ऑक्टोबर पंचांग: दसऱ्याला मीनसह ‘या’ राशींवर धन-सुखाची…
Devendra Fadnavis on Pune Wanvadi Sexual Assualt Case
“स्थानिक नेत्यांनी आरोपीला मदत केली, पण आम्ही…”, पुण्यातील वानवडी येथील अत्याचार प्रकरणात देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान
Rohit pawar on Tanaji Sawant
“मुख्यमंत्री साहेब, हीच तुमच्या महायुती सरकारची क्वालिटी का?” शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशावरून रोहित पवारांचं टीकास्र!
mla mahendra dalvi wife angry on education officers over rcf school issue
आरसीएफ शाळेचा प्रश्न हातघाईवर…आमदार दळवींच्या पत्नीचा शिक्षण अधिकाऱ्यांवर रोष
Vice Chancellor Subhash Chaudhary,
मृत्यूशी झुंज अपयशी! माजी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी काळाच्या पडद्याआड
Land to Chandrasekhar Bawankule organization over the opposition of Finance and Revenue Department Mumbai
विरोध डावलून चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संस्थेला भूखंड
Skywalk for vitthal rukmini Darshan in Pandharpur Approval of the Summit Committee headed by the Chief Minister
पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शन रांगेसाठी ‘ स्कायवॉक ‘, १२९ कोटी खर्चाच्या आराखड्यास मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिखर समितीची मान्यता

डीकेएएससी महाविद्यालयात सकाळच्य सुमारास दोन महाविद्यालयीन युवक गळ्यात भगवे स्कार्फ घालून आले. त्यांना सुरक्षारक्षक, शिक्षकांनी प्रवेशद्वारातच थांबवत हे स्कार्फ ठेवा आणि  परत जाताना घेऊन जा असे सांगितले. याबाबतची माहिती समजताच काही विद्यार्थी तेथे आले व त्यांनी इतर धर्मियांना चालते मग आम्हाला का नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावरुन शाब्दिक वाद झाला. याचवेळी बुरखा घालून आलेल्या काही विद्यार्थींनींनाही प्रवेशद्वारात थांबवण्यात आले. या प्रकाराची माहिती समजताच दोन्ही समाजातील समर्थक मोठ्या संख्येने महाविद्यालयासमोर एकत्र आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. शांततेचे आवाहन करूनही ऐकत नसल्याने पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरु केल्याने धावपळ उडाली. प्राचार्यांनी वरिष्ठांची चर्चा करून होणार्‍या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.