इचलकरंजी येथील दत्ताजीराव कदम एएससी महाविद्यालयात शुक्रवारी धार्मिक पेहराव करुन महाविद्यालयात येणार्‍यावरुन वादाचा प्रसंग घडला. त्यातून मोठ्या प्रमाणात दोन्ही समाजाचे समर्थक महाविद्यालयासमोर जमून जोरदार घोषणाबाजी सुरु झाल्याने काही काळ तणाव पसरला. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील अध्यक्ष असलेल्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत या आठवड्यात दुसऱ्यांदा धार्मिक मुद्द्यावरून वादाचा प्रसंग उद्भवला .  

हेही वाचा >>> कोल्हापूरला पावसाने झोडपले; ४५ बंधारे पाण्याखाली

Salwan Momika Iraqi man burned Quran in Sweden shot dead
मशिदीसमोर कुराण दहन करणाऱ्या व्यक्तिची गोळ्या घालून हत्या; कोण होते सलवान मोमिका?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Burkha Ban , Exam , Dispute , Nitesh Rane ,
बुरखाबंदीचा नाहक वाद
Malankara Jacobite Dispute
Malankara Jacobite Dispute : “धार्मिक स्थळांवर बळाचा वापर करणं वेदनादायी”, केरळमधील चर्च वादावर सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी!
lokmanas
लोकमानस: हा तर श्रद्धेचा राजकारणासाठी वापर
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
A protest over a local court-ordered survey of the Sambhal mosque had led to the death of five people there in November. (Source: File)
VHP : संभल वादावर विहिंपचंं सूचक मौन, काशी आणि मथुरेवर लक्ष केंद्रीत करण्याबाबत चर्चा, दोन दिवसीय बैठकीत काय ठरलं?
dharma sansad mahakumbh
महाकुंभमध्ये भरलेली धर्म संसद म्हणजे नक्की काय? याचे आयोजन नेहमी चर्चेचा विषय का ठरते?

डीकेएएससी महाविद्यालयात सकाळच्य सुमारास दोन महाविद्यालयीन युवक गळ्यात भगवे स्कार्फ घालून आले. त्यांना सुरक्षारक्षक, शिक्षकांनी प्रवेशद्वारातच थांबवत हे स्कार्फ ठेवा आणि  परत जाताना घेऊन जा असे सांगितले. याबाबतची माहिती समजताच काही विद्यार्थी तेथे आले व त्यांनी इतर धर्मियांना चालते मग आम्हाला का नाही? असा सवाल उपस्थित केला. त्यावरुन शाब्दिक वाद झाला. याचवेळी बुरखा घालून आलेल्या काही विद्यार्थींनींनाही प्रवेशद्वारात थांबवण्यात आले. या प्रकाराची माहिती समजताच दोन्ही समाजातील समर्थक मोठ्या संख्येने महाविद्यालयासमोर एकत्र आले. दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी सुरू झाल्यामुळे तणाव निर्माण झाला. शांततेचे आवाहन करूनही ऐकत नसल्याने पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार सुरु केल्याने धावपळ उडाली. प्राचार्यांनी वरिष्ठांची चर्चा करून होणार्‍या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल असे सांगितले.

Story img Loader