लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर : मराठा समाजाला टिकाणारे व शाश्वत आरक्षण दिल्याचा उल्लेख करीत शनिवारी येथे भाजपाच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मराठा समाजाने मागणी केलेल्या सर्व मागण्या या शासन आदेशाद्वारे पूर्ण झाल्याने आज महाद्वार चौक येथे साखर पेढे वाटण्यात आले. आरक्षण देणाऱ्या महायुती सरकारचा विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. जिल्हा उपाध्यक्ष हेमंत आराध्ये,सरचिटणीस गायत्री राऊत, जिल्हा चिटणीस संगीता खाडे, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, प्रदेश सदस्य राहुल चिकोडे यांची भाषणे झाली.

आणखी वाचा-आदिवासी विद्यार्थी चाखणार ‘वारणे’च्या टेट्रापॅकमधील आरोग्यवर्धक सुगंधी दूध

शासनाने शब्द पाळला

दरम्यान, महायुती शासनाने शब्द पाळला. मराठा समाजाला न्याय दिला. आरक्षणाबद्दल ऐतिहासिक निर्णय घेऊन या सरकारने आपली विश्वासार्हता आणि जनसामान्यांबद्दलची आस्था सिद्ध केली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp celebrates in kolhapur over maratha reservation decision mrj
Show comments