राज्य वन्य विभागाच्या स्पर्धा परीक्षा वेळी परीक्षार्थींना मोबाईल पुरवला गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी कोल्हापुरात अन्य परीक्षार्थीनी जोरदार आक्षेप नोंदवत आंदोलन केले. यावरून गोंधळ उडाला. या प्रकाराची शासनाने चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्य वन्य विभागाची विभागातील नोकर भरतीसाठी जिल्हानिहाय परीक्षा सुरू आहे.

हेही वाचा >>> गगनबावड्यात ‘मॉण्टेनचा तस्कर’ दुर्मीळ सापाचा शोध

nta announced some changes to prevent malpractices during NEET UG exam
विश्लेषण : नीट यूजी परीक्षेतील अचानक केलेले बदल गोंधळ वाढवणारे?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
CET exam applications marathi news
सीईटीचे अर्ज भरण्यासाठी अजून एक संधी, दुसऱ्यांदा मुदतवाढ; पाच अभ्यासक्रमांचे अर्ज १० फेब्रुवारीपर्यंत भरता येणार
How to Prepare for Government Jobs with Full Time Job
Sarkari Naukri: पूर्ण वेळ नोकरी करताना सरकारी नोकरीसाठी तयारी कशी करावी? परीक्षेत उतीर्ण होण्यासाठी कसे करावे नियोजन?
10th exam, 12th exam, Maharashtra state board ,
राज्य मंडळाचा मोठा निर्णय… दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार झाल्यास केंद्रांची मान्यता कायमस्वरुपी रद्द
format of Law CET exam has been changed now exam will be of 120 marks instead of 150
विधी सीईटी परीक्षेचे स्वरूप बदलले, क्लॅटच्या धर्तीवर होणार परीक्षा
How to Practice Mock Tests For Exams
SBI PO & Clerk Exam Tips : परीक्षेत चांगले गुण मिळवायचे आहेत? मग मॉक टेस्टचा ‘असा’ करा सराव
causes of GBS, GBS, Central high level team ,
‘जीबीएस’च्या नेमक्या कारणांचा शोध! केंद्रीय उच्चस्तरीय पथकाकडून पुण्यात तपासणी सुरु

नोकरीची संधी असल्याने मोठ्या अपेक्षेने विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. यापूर्वी स्पर्धा परीक्षेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांकडे मोबाईल आढळले आहेत. असाच प्रकार आज शिये येथील केंद्रात घडला तेथे विद्यार्थ्याकडे मोबाईल असल्याचे दिसून आले. त्यावर विद्यार्थ्यांनी आक्षेप नोंदवला. परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थी मोठ्या संख्येने केंद्राबाहेर जमले.  त्यांनी संघाटीतपणे या प्रकारा विरोधात घोषणाबाजी सुरू केली. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.  मात्र कडक तपासणी करून केंद्रात सोडले जात असतानाही मोबाईल आत पोहोचलाच कसा असा मुद्दा उपस्थित करीत अन्य परीक्षार्थीनी आपले म्हणणे जोर जोराने मांडायला सुरुवात केले. राज्य शासनाने या प्रकारामध्ये लक्ष घालून चौकशी करावी अन्यथा आंदोलन करावे लागेल, अशी प्रतिक्रिया यावेळी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे गिरीश फोंडे यांनी व्यक्त केली.

Story img Loader