लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापूर : संत निरंकारी मंडळ यांच्या वतीने आज देशभरात २७ राज्ये, ९०० शहरे व १६०० ठिकाणी प्रकल्प अमृत अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन ‘ या उपक्रमा अंतर्गत रविवारी जलस्वच्छता अभियान राबवण्यात आले. संत निरंकारी सत्संग मंडळ इचलकरंजी शाखेने येथील पंचगंगा नदीच्या घाटावर व तसेच गणपती मंदिर परिसराची स्वच्छता मोहीम राबवली.

आणखी वाचा-कोल्हापूर : चंदगड तालुक्यात टस्कर हत्तीचा उपद्रव वाढला

सद्गुरू माता सुदिक्षा यांच्या सुचनेनुसार देशभरात २७ राज्ये, ९०० शहरे व १६०० ठिकाणी प्रकल्प अमृत अंतर्गत हे सेवाकार्य करण्यात आले. यावेळी निरंकारी सत्संग सेवा मंडळाचे दत्तात्रेय गोरे, विलास लाड,पांडुरंग भोई, मुखी, सेवा दल अधिकारी, महिला, पुरुष,युवक- युवती सहभागी झाले होते. स्वच्छता अभियानाचा प्रारंभ इचलकरंजी नागरिक मंचचे अध्यक्ष अभिजीत राजेंद्र पटवा, उपाध्यक्ष, उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अप्पासाहेब पाटील यांनी केले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cleanliness mission at panchganga ghat by sant nirankari satsang mandal mrj