कोल्हापूर : देशातील विद्यमान सरकारची वाटचाल पाहता देशात लोकशाही, प्रजासत्ताक आणि राज्यघटना धोक्यात आले आहे. त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आमचे सर्वात पहिले उद्दिष्ट हे भाजपला पराभूत करणे राहील. यासाठी आम्ही इंडिया आघाडी सोबत आहोत, असे मत
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे महासचिव माजी खासदार कॉम्रेड डी राजा यांनी व्यक्त केले.

प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, मोदींनी वास्तवात कोणताही विकास केलेला नाही. त्यांना आम्ही आव्हान देतो की त्यांनी लोकांच्या वास्तववादी जीवन मरणाशी निगडित मुद्द्यांवर बोलावे. देशाचा मानवी विकास निर्देशांकामध्ये देशाचा स्तर घसरला. भूक निर्देशांकमध्ये देश मागे आहे. गरीबी, बेरोजगारीमध्ये जनता होरपळत आहे. पत्रकारितेचे स्वातंत्र्य निर्देशांकामध्ये देखील देशात स्तर घसरला आहे.

How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Russian President Putin statement that India is in constant contact for a solution to the Ukraine conflict
युक्रेन संघर्षावर तोडग्यासाठी भारताच्या सतत संपर्कात; रशियाचे अध्यक्ष पुतिन यांचे वक्तव्य
udhhav thackeray
MVA Jode Maro Andolan : “मोदी माफी मागत असताना व्यासपीठावर…”, उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर टीका!
MPSC, autonomy MPSC, Interference MPSC, satej patil
‘एमपीएससी’च्या स्वायत्ततेत हस्तक्षेप?
Prime Minister Narendra Modis visit to Poland and Ukraine is for the future
मोदींची पोलंड, युक्रेन भेट ‘मध्यस्थी’साठी नव्हे… भवितव्यासाठी!
President Draupadi Murmu asserts that faith in the Constitution is important
राज्यघटनेवरील विश्वास महत्त्वाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे प्रतिपादन
independence day 2024
अग्रलेख: स्वातंत्र्य… आपले आणि त्यांचे!

हेही वाचा – मोदी मुमकिन नव्हे नामुमकिन; शरद पवार यांची टीका

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली

दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. कारण मोदींची गॅरंटी होती की शेतकऱ्यांना एमएसपी कायदा पारित करतो. पण भाजप सरकारने पलटी मारली. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. स्वामीनाथन यांना भारतरत्न देण्याचे नाटक करणारे हे सरकार त्यांनी केलेल्या एमएसपी सारख्या शिफारशीवर कानाडोळा करत आहे. कोणतेही जमिनीवर मूलभूत काम न करता मोदी सरकार ढोंगी प्रचार करत आहे. ते लोकांची विचार करण्याची शक्ती हायजॅक करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

मोदींचा कार्यकाळ विध्वंसकारी

मोदींचा कार्यकाळ हा विध्वंसकारी राहिला आहे. आम्ही देशातील सर्व धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांना आवाहन केले आहे की त्यांनी जनतेमध्ये जावे व मोदी सरकारच्या विरोधात लोकांना जागरूक करावे. काहीही करून भाजपला केंद्रामध्ये पराभूत करावे लागेल. देशातील घटनाकृत विविध स्वायत्त संस्थांच्यावर हल्ले होत आहेत, हस्तक्षेप होत आहे. निवडणूक आयोग हा भाजपचा प्रचार संस्थेसारखा काम करत आहे. आमच्या पक्षाचे खासदार इंद्रजीत गुप्तांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या निवडणूक सुधारणा आयोग शिफारशीच्यांवर अजून देखील संसदेत चर्चा केलेली नाही. पण भारतासारख्या वैविध्य असलेल्या देशांमध्ये भाजप आरएसएस हे “वन नेशन वन इलेक्शन ” योजना लागू करू पाहत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा याला विरोध आहे. ईव्हीएम शिवाय मतपत्रिकेवर देशात निवडणूक घेण्याची आमची मागणी आहे. मोदी म्हणतात सबका साथ सबका विकास. पण मोदींची कोणाबरोबर साथ आहे? महिला, युवक, शेतकरी, कामगार यांच्या प्रश्नांच्याकडे दुर्लक्ष करून सबका साथ सबका विकास कसे म्हणता येईल.

हेही वाचा – बाजार समितीत कायमस्वपरूपी प्रशासक नेमणुकीचा निर्णय मागे घ्या, अन्यथा.. ; राजू शेट्टी यांचा इशारा

शिर्डी, परभणी मतदारसंघाची मागणी

यावेळी बोलताना भा.क.प.चे राज्यसचिव कॉम्रेड सुभाष लांडे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने फोडाफोडीचे राजकारण करून राजकीय संस्कृती लयास घालवली आहे. जनता भारतीय जनता पार्टीला महाराष्ट्रात सडेतोड उत्तर देईल. आम्ही देशपातळीवर इंडिया आघाडी व महाविकास आघाडी बरोबर आहोत. शिर्डी व परभणी अशा दोन लोकसभा मतदारसंघांची आम्ही आघाडीकडे मागणी केली आहे. तिथून निवडणूक लढण्याची पक्षाची तयारी चालू आहे.

पत्रकार परिषदेला पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी सतीशचंद्र कांबळे, जिल्हा सेक्रेटरी गिरीश फोंडे, दिलीप पवार, दिलदार मुजावर यासह कार्यकर्ते उपस्थित होते.