लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी गुरुवारी नागरिकांनी महानगरपालिकेवर जोरदार निदर्शने केली. प्रशासनाच्या कारभाराविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

Dont take sin of closing distillery project of Bidri factory says Former President Dinkarrao Jadhav
‘बिद्री’ कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प बंद पाडण्याचे पाप माथी घेऊ नका; माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांचे भावनिक आवाहन
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
chappal at modi car video
Video: पंतप्रधान मोदींच्या कारवर फेकली चप्पल, व्हिडीओ व्हायरल; कार पुढे येताच सुरक्षा रक्षकाने…
Sania Mirza Marrying Mohammed Shami Rumors
सानिया मिर्झा व मोहम्मद शमीच्या लग्नाच्या चर्चांवर सानियाच्या वडिलांनी सोडलं मौन; म्हणाले, “ती त्याला भेटली..”

गेली साडेतीन वर्षे कोल्हापूरमध्ये प्रशासकीय कामकाज सुरू असून शहरातील नागरी सुविधांचा पूर्णपणे बोजवारा उडालेला आहे. नागरिकांनी शेकडो निवेदने, संस्था -संघटना, राजकीय पक्षांची आंदोलने होऊन सुद्धा महानगरपालिका प्रशासन ढिम्मच आहे. या प्रशासनाला जाग आणण्यासाठी भाजपचे माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे यांनी ११ जून रोजी लाक्षणिक उपोषण केले होते.

आणखी वाचा-शाहू जयंतीच्या मिरवणुकीला रोखताच कसे? हसन मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना खडसावले; व्हिडीओ व्हायरल

मागील आठवड्यात मुक्त संवाद आयोजित करून नागरीकांच्या तक्रारी व कोल्हापूरच्या विकासासंबंधीच्या संकल्पना एकत्रित केल्या होत्या. त्यावेळी आलेल्या शेकडो तक्रारींच्या निराकरणासाठी आज महानगरपालिकेवर निदर्शने करण्यात आली. घोषणांचे फलक घेऊन नागरिक या आंदोलनात सामील झाले. मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत चव्हाण, डॉ.अश्विनी माळकर, प्रा. नीलिमा व्हटकर, जयंत गोयाणी, प्रताप देसाई यांनी यावेळी मनोगते व्यक्त केली व विविध अडचणींचा पाढा वाचला.

अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी आंदोलकांनी महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या विभागातील गलथान कारभाराची माहिती दिली. या समस्यांची निर्गत करण्यासाठी प्रत्येक विभागासोबत आंदोलकांची वेगळी बैठक लावण्याचे मेनी करण्यात आले.