कोल्हापूर : चंदगड विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीचा वाद गोवामार्गे मुंबईत पोहोचला आहे. चंदगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) उमेदवार आमदार राजेश पाटील यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केली आहे. असे असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी गेल्यावेळचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील हे रिंगणात असतील, असे जाहीर केल्याने महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. सावंत यांच्या या विधानावर पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार राजेश पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत हा विषय देवेंद्र फडणवीस, अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा

devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
सोनिया गांधींच्या राष्ट्रपतींवरील टीप्पणीवरून वादंग
Ravindr Dhangkar on Shiv sena :
Ravindr Dhangkar : माजी आमदार रविंद्र धंगेकर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार? स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी काँग्रेस पक्षात…”
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
Bharatshet Gogawale On Sunil Tatkare
Bharatshet Gogawale : पालकमंत्रिपदाचा वाद विकोपाला? “…तर मंत्रिपदाचा राजीनामा देतो”, भरत गोगावलेंचं सुनील तटकरेंना खुलं आव्हान
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”
competition between Ashok Chavan and Pratap Patil Chikhlikar over party defection
अशोक चव्हाण – चिखलीकरांमध्ये पक्षांतरावरून स्पर्धा

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व चंदगड या दोन मतदारसंघात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. कागलमध्ये हसन मुश्रीफ यांची उमेदवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषित केल्यावर भाजपचे माजी ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली आहे. असेच वादाचे पडसाद शेजारच्या चंदगड मतदारसंघात दिसत आहेत.

येथे गेल्या आठवड्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्यमान आमदार म्हणून राजेश पाटील यांची उमेदवारी घोषित केली. त्यामुळे पाटील समर्थकांनी थेट प्रचाराला सुरुवात केली. तोपर्यंत इकडे गेल्या वेळचे बंडखोर उमेदवार शिवाजी पाटील यांनी हालचाली वाढवल्या आहेत. मुंबईत झालेल्या दहीहंडी समारंभात देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पाटील यांच्या पाठीशी राहण्याची भूमिका घेतली होती.

हेही वाचा >>> कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला शासकीय निधीची वानवा

चंदगडमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शिवाजी पाटील हे निवडणूक रिंगणात असतील आणि ते विजयी होतील, असे विधान केले होते. मुख्यमंत्री सावंत यांचे हे विधान महायुतीतील वादाला कारणीभूत ठरले आहे. यावर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असताना गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन वाद निर्माण करणे अयोग्य आहे, ‘ अशा शब्दांत नाराजी व्यक्त केली. राजेश पाटील यांनी सावंत यांच्या विधानाला आक्षेप घेतला आहे. ‘महायुती अबाधित ठेवायची असेल आणि लोकसभेला ज्या पद्धतीने झाले ते विधानसभेला व्हायचे नसेल तर त्या पक्षातील नेत्यांनी इच्छुकांना समजावून सांगावे,’ अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. चंदगड मतदारसंघावरून महायुतीत पेटलेल्या वादाचे आता कसे निराकरण केले जाणार याकडे लक्ष लागले आहे.

Story img Loader