कोल्हापूर : बिद्री कारखान्याचा डिस्टलरी प्रकल्प उभारणीपासून ते उत्पादन सुरु होईपर्यंत वेळोवेळी या प्रकल्पाला अडचणीत आणण्याचे काम काही शक्तींनी केले आहे. बिद्री कारखाना कुणाची वैयक्तिक मालमत्ता नसून तो तमाम ६५ हजार सभासदांच्या मालकीचा आहे. त्यावर साखर कामगार, तोडणी मजूर, वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी, व्यावसायीक या सर्वांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून या डिस्टलरीकरिता सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. राधानगरी-भुदरगडमधील विधानसभेच्या राजकारणाचा बिद्री कारखाना राजकीय अड्डा होऊ न देता चांगला प्रकल्प बंद पाडण्याचे पाप विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या माथी घेऊ नये, असे, आवाहन माजी अध्यक्ष , माजी आमदार दिनकरराव जाधव यांनी केले आहे.

राज्य उत्पादन शुल्कने बिद्री साखर कारखान्याच्या डिस्टलरीचा परवाना रद्द करण्याच्या कारवाईविषयी आपली भूमिका मांडताना ते बोलत होते. जाधव म्हणाले, मी पण १९८५ ते २००५ पर्यंत बिद्रीचा अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो. तत्कालीन परिस्थितीत माझ्या विरोधात असलेले माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील असतील किंवा त्यावेळचे आमदार बजरंगअण्णा देसाई असतील त्यांनी कधीही कारखान्याच्या कामकाजामध्ये प्रशासकीय स्तरावर कधीही हस्तक्षेप केला नाही. सत्तेचा गैरवापर करुन शासकीय अधिकाऱ्यांकडून कधीही त्रास झाला नाही.

Hasan Mushrif
“…तर के.पी. पाटलांच्या घरावर छापा टाकायचा ना?”, बिद्री कारखान्याच्या कारवाईवरून हसन मुश्रीफांचे सरकारला खडेबोल
distillery license of bidri sugar factory
बिद्री कारखान्याचा डिस्टलरी परवाना रद्द; के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना धक्का
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
NCP MLA Rohit Pawar
“दोन दिवस थांबा, राज्याला हादरवून सोडणारा खुलासा…”, रोहित पवार यांचं मोठं विधान
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान

आणखी वाचा-कोल्हापूर महानगरपालिकेच्या सुस्त कारभाराविरोधात निदर्शने

पण आजचे चित्र भयावह आहे. वैयक्तिक मतभेदातून बिद्री सारख्या मातृसंस्थेला अडचणीत आणण्याचे काम सुरु आहे. आपले वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून डिस्टलरीकरिता सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत. कारखान्यात काही चुकीचा कारभार होत असल्यास त्यावर आपण जरूर आवाज उठवावा. त्यासाठी शासकीय पातळीवर जरुर पाठपुरावा करावा. पण डिस्टलरी प्रकल्प बंद पाडण्याचे पाप आपल्या माथी घेऊ नये, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली आहे.