लोकसत्ता वार्ताहर

वाई: साताऱ्यात करोनाचे रुग्ण वाढल्याने नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सायंकाळी केले आहे. साताऱ्यात करोनाचे उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. साताऱ्यात नव्याने करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सायंकाळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सार्वजनिक ठिकाणी मुखपट्टी वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय घेतला.

मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Ex PM Manmohan Singh
Dr. Manmohan Singh Death: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कुठे राहात होते? या बंगल्याची खासियत काय?
Drone survey of 332 villages in Sangli district
सांगली जिल्ह्यातील ३३२ गांवाचे ड्रोनव्दारे सर्व्हेक्षण; ६७ हजार मिळकतपत्रिका, सनद नकाशे तयार
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी

साताऱ्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर आता सर्व शासकीय,निमशासकीय, शाळा,बँकांमध्ये मास्क वापरणे बंधनकारक करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.साताऱ्यात करोनाचे पन्नास रुग्ण मागील काही दिवसात नव्याने निष्पन्न झाल्याने व दररोज रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

या पार्श्वभूमीवर शासनाकडून प्रतिबंधात्मक उपायांची खबरदारी घेतली जात आहे. अशातच, साताऱ्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, बँका, शाळा, महाविद्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मास्क वापरणे अनिवार्य करण्यात आले आहे. यासंबंधी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आदेश दिले आहेत. तसेच, नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.साताऱ्यात करोनाचे उपचार घेणाऱ्या फलटण तालुक्यात व साताऱ्यात उपचार घेणाऱ्या दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुभाष चव्हाण यांनी सांगितले.

Story img Loader