शनिशिंगणापूरपाठोपाठ श्री महालक्ष्मी मंदिरातील गाभा-यातही महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. यानुसार आज ७ महिलांनी गाभा-यात प्रवेश केला. या प्रश्नी आंदोलन करणा-या आणि त्यांना विरोध करणा-या दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींसह प्रशासन आणि श्रीपूजक यांच्या दरम्यान आज झालेल्या बैठकीनंतर प्रतिकात्मक रूपात आज महिलांनी प्रवेश केला.
शनिशिंगणापूरपाठोपाठ कोल्हापूर येथेही मंदिराच्या गाभा-यात महिलांना प्रवेश द्यावा या मागणीसाठी गेले काही दिवस आंदोलन सुरू होते. याबाबत आज सर्वपक्षीय संघटना, श्रीपूजक, आंदोलक आणि हिंदुत्ववादी संघटना यांच्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. यानुसार सायंकाळी प्रतीकात्मक स्वरूपात स्त्री-पुरुष समानता संघटनेच्या ५ व हिंदुत्ववादी संघटनेच्या २ महिलांना गाभा-यात प्रवेश देण्यास मान्यता दिली. या ७ महिलांनी पितळी उंबरा ओलांडून महालक्ष्मीची ओटी भरल्यावर या वादावर पडदा पडला.
दरम्यान या प्रवेशापूर्वी झालेल्या बैठकीत दोन्ही बाजू हातघाईवर आल्याने खूप गोंधळ उडाला होता. प्रवेशाच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवण्याचा हा खटाटोप असल्याचा आरोप या वेळी हिंदुत्ववादी संघटनांनी केला.

Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Cattle Slaughter Bhandara, Cattle , Marriage ,
भंडारा : धक्कादायक! ‘दावत’साठी मंडपामागेच गोवंशाची कत्तल
supporters of former mla Prakash Awade attempted to break into Abhishek Spinning Mill over financial embezzlement
आर्थिक व्यवहारातून आवाडेंचा सूतगिरणी चालकांसोबत वाद
ladies group dance on hi navri asli song from navri mile navryalla video
“ही नवरी असली, अरे, ही मनात ठसली” नऊवारी साडी नेसून महिलांचा जबरदस्त डान्स; रातोरात VIDEO झाला व्हायरल
Prostitution under name of massage parlour in Kalyaninagar police arrest one
कल्याणीनगरमध्ये मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पोलिसांकडून एकास अटक
Kumbh stampede 1952
Mahakumbh Stampede: एका हत्तीमुळे कुंभमेळ्यात गेले होते ५०० भाविकांचे प्राण; पंडित जवाहरलाल नेहरुंवर झाले आरोप
Prayagraj Stampede
Mahakumbh Stampede: महाकुंभमध्ये चेंगराचेंगरीनंतर पंतप्रधान मोदींचा तीन वेळा योगी आदित्यनाथांना फोन, नेमकी चर्चा काय झाली?
Story img Loader