लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : कागल तालुक्यातील महायुतीतील तीन गट एकत्र येऊन मताधिक्य मिळवत राहिले तर कोल्हापूर लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव साक्षात परमेश्वर आला तरी होऊ शकत नाही, असा विश्वास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
बीड राष्ट्रवादीमध्ये अजितदादांच्या इशाऱ्यानंतर ‘साफसफाई’ होणार का ?
Namdeo Shastri On Dhananjay Munde
Namdeo Shastri : “भगवान गड धनंजय मुंडेंच्या भक्कमपणे पाठिशी”, नामदेव शास्त्री महाराज यांनी मांडली भूमिका
lokmanas
लोकमानस: लोकशाही की एकाधिकारशाही?
Chandrakant Patil on Dhananjay Munde
Chandrakant Patil: “… तर मुख्यमंत्री धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील”, चंद्रकांत पाटील यांचं मोठं विधान
Junaid Khan sat outside at Ira Khan wedding
बहिणीच्या लग्नात कुटुंबाने दिली नाही कोणतीच जबाबदारी, बाहेर बसला होता जुनैद खान, कारण…
Nitish Kumar On Manipur Politics
Manipur Politics : नितीश कुमार यांचा पक्ष मणिपूरमध्ये एनडीएमध्ये सहभागी असणार की नाही? संभ्रमाच्या परिस्थितीमुळे चर्चांना उधाण

सेनापती कापसी (ता. कागल) येथे हुतात्मा चौकात झालेल्या प्रचार सभेत मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, कागल तालुक्यामध्ये अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस, शिंदेसेना, समरजित घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा गट संजय मंडलिक यांच्या प्रचारासाठी एकत्र आला आहे. तिन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की कोणी कोणाच्या बोलण्यातून कृतीतून दुसऱ्या गटाचे कार्यकर्ते नाराज होतील आणि त्याचा परिणाम मंडलिक यांच्या मताधिक्यावर होईल अशी कृती आणि वक्तव्यही करू नये. आम्ही आता तुम्हाला मदत करणार आहोत तुम्ही विधानसभेला आमचे काय करणार अशा विषयाच्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजेत.

आणखी वाचा-लोकवर्गणीतून लोकसभा निवडणूक लढवून जिंकणार; राजू शेट्टी यांचा विश्वास

संजय मंडलिक म्हणाले, सदाशिवराव मंडलिक व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या राजकीय व सार्वजनिक जीवनात चिकोत्रा खोरातील जनता नेहमीच पाठीशी राहिली आहे. ही परंपरा यावेळीही अबाधित राहील. यावेळी शशिकांत खोत, सूर्याजी घोरपडे, अलका साळवी, मारुती चोथे आदींची भाषणे झाली.

Story img Loader