कोल्हापूर : बिद्री येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या इथेनॉल  प्रकल्पावर करण्यात आलेल्या कारवाईबद्दल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी मंगळवारी राधानगरी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा काढला. भर पावसात निघालेल्या मोर्चावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

बिद्री साखर कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई केली असून इथेनॉल प्रकल्प बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हि कारवाई करण्याच्या सूचना आमदार प्रकाश आबिटकर यांनी दिल्या होत्या, असा आंदोलकांचा आरोप आहे. राजकीय आकसातून  झालेल्या या कारवाईच्या निषेधार्थ बिद्रीच्या सभासदांनी पावसाची संततधार सुरु असताना जोरदार घोषणाबाजी करत मोर्चा काढला. यावेळी आमदार प्रकाश आबिटकर यांचा निषेध नोंदवण्यात आला.

Hasan Mushrif
“…तर के.पी. पाटलांच्या घरावर छापा टाकायचा ना?”, बिद्री कारखान्याच्या कारवाईवरून हसन मुश्रीफांचे सरकारला खडेबोल
wardha, Sharad Pawar, amar kale,
शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या
nilesh lanke sharad pawar
“निलेश लंकेंना संसदेत पाहून लोक विचारतील, हा कोण…”, शरद पवारांचं वक्तव्य; म्हणाले, “ते मराठीत काय बोलतील…”
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
distillery license of bidri sugar factory
बिद्री कारखान्याचा डिस्टलरी परवाना रद्द; के. पी. पाटील, हसन मुश्रीफ यांना धक्का
Devendra Fadnavis On Uddhav Thackeray Anil Parab
“उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे सेनापती…”, फडणवीसांकडून ठाकरे गटाच्या आमदाराचं तोंडभरुन कौतुक
Sharad Pawar and Ajit Pawar
अजित पवारांसाठी परतीचे दार बंद झाले का? शरद पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले, “सवाल…”
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात मुसळधार; पूर्वेकडे उसंत

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या या कारवाईमुळे पुढील हंगाम सुरू होण्याबाबत प्रश्नचिन्ह लागले आहे. शेतकरी, कामगार उध्वस्त होणार आहेत. सर्वांनी संघटित होउन लढा देणे गरजेचे आहे. कारवाईबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार के.पी. पाटील यांनी नमूद केले. 

मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.जालिंदर पाटील, अजित पोवार,तानाजी खोत, शिवाजीराव परुळेकर, शरद पाडळकर,शिवसेनेचे नेते सुरेश चौगुले,संजय कांबळे,बिद्रीचे  संचालक, शेतकरी उपस्थित होते.