लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी देवीसाठी सोन्याचा मुलामा असलेली प्रभावळ अर्पण भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांच्या हस्ते देवस्थान समितीकडं सुपूर्द करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवापासून ही प्रभावळ वापरात येणार आहे.

Yarn mills in the state are on the verge of closure
राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
What Narendra Modi Said?
Narendra Modi : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींची पोस्ट, “या अद्वितीय भाषेला…”
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Sharad Pawar Reaction on Akshay Shinde Death
Sharad Pawar : “गृहविभागाने दाखवलेला हलगर्जीपणा…”, अक्षय शिंदे चकमकीत ठार झाल्यानंतर शरद पवारांची प्रतिक्रिया
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

खासदार धनंजय महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत करवीर निवासिनी श्री अंबाबाई सुवर्ण पालखी ट्रस्टच्या वतीने यापूर्वीच देवीला सुवर्ण पालखी अर्पण करण्यात आली आहे. त्यानंतर सुवर्ण प्रभावळ घडवण्याचा संकल्प पूर्ण झाला आहे. ८० वर्षापूर्वीच्या प्रभावळीवर ट्रस्टच्यावतीने सोन्याचा मुलामा देण्यात आला. ४५ तोळे सोने वापरण्यात आले असून त्याची किंमत ३५ लाख रुपये आहे. गणेश चव्हाण आणि कारागिरांनी हे काम केले आहे.

आणखी वाचा-राज्यातील सूतगिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर!

देवस्थान समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी या प्रभावळीचा स्वीकार केला. नवरात्रोत्सवात देवीसाठी ही सेवा करण्याचे भाग्य मिळाले, अशी प्रतिक्रिया अरूंधती महाडिक यांनी व्यक्त केली. गोरखनाथ चिंचवडे, अजित जाधव, नारायण बुधले, वसंत पंदरकर यांच्यासह काही देणगीदारांनी या सुवर्ण प्रभावळीसाठी सोने दिले आहे. त्यांचाही सत्कार महाडिक यांच्या हस्ते करण्यात आला. महेंद्र इनामदार, जितेंद्र पाटील, अवनी सेठ, रामाराव, महादेव दिंडे उपस्थित होते.