कोल्हापूर : मराठा समाजाची सरसकट आरक्षणाची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे का हे पाहणे महत्वाचे आहे. राज्य शासनाने लोकांच्या मनातील संभ्रमावस्था दूर करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठा समाजाची फसवणूक होईल, असे मत विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.

आमदार पाटील पत्रकारांशी बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात बोलले. मात्र दोन्ही उपमुख्यमंत्री अद्याप बोललेले नाहीत. शासनाने प्रारूप अधिसूचना जारी केली असली तरी त्याबाबत आगामी पंधरा दिवसानंतर काय घडणार याला महत्व प्राप्त झाले आहे. प्रारूप अधिसूचनेबाबत स्पष्टता येण्यासाठी शासनाकडून खुलासा होणे गरजेचे. प्रारूप अधिसूचना आणि यातील कायद्याच्या बाजू, वस्तुस्थिती लोकांसमोर आणली गेली पाहिजे. शासनाचे नेमके धोरण कोणते आहे हे थोड्या दिवसात लोकांना कळेल.

Shatrughan Sinha on non-vegetarian food ban
Shatrughan Sinha: ‘संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घाला’, शत्रुघ्न सिन्हांच्या मागणीमुळे तृणमूल काँग्रेस अडचणीत
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Will return both maces Chandrahar Patils stance in protest against umpire
दोन्ही गदा परत करणार! पंचाच्या निषेधार्थ चंद्रहार पाटलांची भूमिका
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
SC asks Centre and states not to take steps to reduce forest
परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका!सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारांना आदेश
controversial statements by bjp union minister
भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या विधानांमुळे वाद; विरोधकांच्या टीकेनंतर सुरेश गोपी यांची सारवासारव
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..
NGO , social work, transparency, accountability,
संस्थांची संस्थाने होताना..

आणखी वाचा-अयोध्येतील सोहळ्यामुळे राज्यातील वस्त्रोद्योगात कोट्यवधींची उलाढाल; श्रीराम नामाचे कुर्ते, शर्ट, साड्यांची मोठी निर्मिती

राहुल गांधी आणि काँग्रेसने पहिल्यापासूनच जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी केली आहे. आरक्षणाच्या मुद्द्याकडे राजकीय दृष्टिकोनातून न पाहता केंद्र आणि राज्य सरकारने आरक्षण शंभर टक्के कसे टिकेल हे पाहणे महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

विरोधात फूट पडत असल्याकडे लक्ष वेधले असता आमदार पाटील म्हणाले, भाजप इंडिया आघाडी मध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. तथापि लोकसभा निवडणूक ही भाजप विरुद्ध देशाची जनता अशी असेल. नितीश कुमार यांचा फारसा परिणाम होणार नाही असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहेच.

Story img Loader