कोल्हापूर : पन्हाळागडाला लागून असलेल्या पावनगड येथील ४५ वर्षांपूर्वीचा अनाधिकृत मदरशा आज प्रशासनाने अखेर जमीनदोस्त केला. यावेळी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोणालाही घटनास्थळी फिरकू दिले नव्हते. काही हिंदुत्ववादी संघटनांकडून मदरशाबाबत तक्रारी प्रशासनाकडे दाखल करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवर गेले आठवडाभर कारवाई अत्यंत गुप्ततेने सुरू होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार शुक्रवारी रात्री प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. मध्यरात्रीनंतर हा मदरशा पाडण्यास सुरुवात झाली.

हेही वाचा : महानंद ‘एनडीडीबी’ला चालवण्यास देणे म्हणजे राज्य सरकारचे अपयश;राजू शेट्टी यांची टीका

Rain Updates, rain Maharashtra, heavy rain,
Rain Updates : राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता; ‘या’ विभागांना ‘यलो अलर्ट’
pandharinath kamble daughter grishma supports father and shared angry post on jahnavi killekar
बाबाच्या अपमानानंतर पंढरीनाथ कांबळेच्या लेकीची जान्हवीसाठी पोस्ट; म्हणाली, “त्यांच्या करिअरवर बोलण्याआधी…”
Sindhudurg, Fishing boat accident,
सिंधुदुर्ग : मासेमारीला गेलेली नौका दुर्घटनाग्रस्त, तिघांचा बुडून मृत्यू
video, scooter, bridge, Yavatmal,
VIDEO : पाणी वाहात असलेल्या पुलावरून दुचाकी नेणे पडले महागात
water tanker in thane
मुसळधार पावसात कल्याणमधील आधारवाडी, गांधारे रोड परिसरात तीव्र पाणी टंचाई; महागड्या टँकरच्या पाण्यावर रहिवासी अवलंबून
Due to flood in Kolhapur citizens are suffering due to mud waste uncleanliness stench in the city
आता चिखल, दुर्गंधीचा पूर… कोल्हापुरात कचरा, अस्वच्छता, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त
Dapoli, Kiramba village, evacuation, mountain cracks, heavy rains in dapoli, heavy rains in Kiramba Village, heavy rains, disruption, flooding, landslides, road closure, government order, villagers
दापोली किरांबा येथील डोंगराला तडा गेल्याने ग्रामस्थांना स्थलांतर करण्याचे आदेश
Water enter in the house due to rain in Nagpur angry citizens broke the road
नागपुरात घरात पाणी, संतप्त नागरिकांनी रस्ताच तोडला

छत्रपती शिवरायांनी बांधलेल्या पावनगड या गडावर सध्या संपूर्ण मुस्लिम वस्ती राहण्यासाठी आहे. याचा गैरफायदा घेत १९७९ साली सय्यद या आडनावाच्या इसमाने बेकायदेशीर मदरशा पावनगड येथे बांधला. सद्यस्थितीत या मदरशात पश्चिम बंगाल व बिहारमधील ४५ मुले शिक्षण घेत होती. गुरुवारी सायंकाळी येथील सर्व मुलांना शिरोली येथील मदरशामध्ये नेण्यात आले. त्यानंतर मदरशा पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली. मदरशा सुमारे दोन गुंठे क्षेत्रामध्ये बांधला गेला होता. हे क्षेत्र महसूलच्या अखत्यारीत येत असल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : राहुल गांधींच्या यात्रेने काँग्रेसची उरलेली राज्येही सत्तेतून जातील, राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

मदरशा पाडण्याबाबत प्रशासनाने कमालीची गुप्तता पाळत गुरुवारी सायंकाळी सुमारे चारशे पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त बुधवार पेठेपासून ते पावनगडपर्यंत ठेवण्यात आला होता. यात पोलीस अधिक्षक, पन्हाळा उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, पोलीस उपअधीक्षक ठाण मांडून बसले होते. मदरशा पाडण्याची कारवाई दुपारनंतर पूर्ण झाली.