कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आठवडाभर परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे भात पिकाची कापणी आणि झोडपणीची कामे खोळंबली आहेत. भात पिकाची मोठ्या प्रमाणात पडझड झाल्याने हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे. जिल्ह्यात यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन नदीकाठच्या शेतकऱ्यांच्या भात, सोयाबीन, भाजीपाला, ऊस पिकांचे नुकसान झाले.

सततच्या पावसामुळे ऊस पिकाची पुरेशी वाढ झाली नाही. खरिपातील भात, नाचणी, भुईमूग, वरी आदी पिकांसाठी पोषक असा पाऊस झाल्याने ही पिके समाधानकारक आहेत. मात्र भुईमूग पिकावर हुमणी रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने या पिकाच्या उत्पादनात घट होणार आहे.

due to heavy rain in uran farmer losing their crops
परतीच्या पावसामुळे उरणमधील शेतीचे नुकसान, कृषी विभागाने पंचनामे करण्याची शेतकऱ्यांची मागणी
19th October 2024 Rashibhavishya In Marathi
१९ ऑक्टोबर पंचांग: भरणी नक्षत्रात बहरणार प्रेमाची नाती,…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
due to leopard attcak villegers in terror in chandrapur
बिबट्याच्या “त्या” सवयीने गावकरी दहशतीत
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
Damage to crops due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात पावसाने पिकांचे नुकसान; विमा कंपनीकडून सव्वा लाख शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे
heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
Roads bad condition Mumbai, heavy rain Mumbai,
मुंबई : जोरदार पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था, जलमय भागातील खडी वाहून गेल्याने पुन्हा खड्डे

हेही वाचा: भविष्य निर्वाह निधी विभागाची शिवाजी विद्यापीठाला कारणे दाखवा नोटीस, भ्रष्टाचाराच्या आरोपाने खळबळ

शेतकऱ्यांची दिवाळी कडू

सध्या भात कापणीयोग्य झाले आहे. परिपक्व झालेल्या भात पिकाच्या कापणी आणि झोडपणीच्या कामाला शेतकऱ्यांनी मोठ्या उमेदीने सुरुवात केली होती. मात्र गेल्या आठवड्यापासून या परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे ही कामे ठप्प झाली आहेत. कापणी केलेल्या भात पिकाची पिंजार शेतात कुजून जात आहे. जोरदार पावसामुळे काढणीयोग्य भात, सोयाबीन पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी कडू झाली आहे.