कोल्हापूर : वास्तूचा गृहप्रवेश करताना सुवासिनी महिलांना सन्मान देण्याच्या परंपरागत प्रथेला छेद देत कोल्हापुरातील एका शासकीय अधिकाऱ्याने विधवांच्या हातून बुधवारी गृहप्रवेशाचे विधी केला. या कृतीने त्यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापुरच्या मातीत नवा पायंडा पाडला आहे. सण समारंभ, उत्सव, विवाह सोहळा असेल तर विधवांना गौण स्थान दिले जाते. हळदी- कुंकू, मान- सन्मान यापासून त्यांना दूर सारले जाते . अलीकडे समाजातील अनिष्ट रूढी परंपरांचा पगडा कमी होत असल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक ठराव करून रूढी परंपरांना मूठमाती देण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तूचा गृहप्रवेश करताना सात सुवासिनींचे पूजन करून त्यांना जेवण देत नव्या वास्तूत पंगत बसवण्याची परंपरा या भागात गेली अनेक वर्ष सुरू आहे. तिला छेद कसबा बावडा येथील वितरण अधिकारी दीपक वावरे यांनी दिला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा