कोल्हापूर : आजरा सहकारी साखर कारखाना फार मोठ्या आर्थिक अडचणीतून जात असून त्यातून त्याला सावरूनच दाखवू, असा विश्वास वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. आजरा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर मुश्रीफ म्हणाले, आता आजऱ्याचे रणशिंग फुंकले आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून मी, आमदार सतेज पाटील व आमदार विनय कोरे यांनी भरपूर प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले नाही.

हेही वाचा : इथेनॉल निर्मिती बंदीचा तो निर्णय लोकसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून – आमदार सतेज पाटील

Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
vicharmanch article on gst and financial decline
आपली आर्थिक घसरण राेखण्यासाठी…
Amit Shah unveils BJP’s Delhi manifesto with promises for Mahabharata Corridor, Yamuna Riverfront, and 50,000 government jobs.
महाभारत कॉरिडॉर ते ५० हजार सरकारी नोकऱ्या, दिल्लीसाठी भाजपाच्या तिसऱ्या जाहीरनाम्यात काय?
crop insurance scam loksatta news
बडे राजकारणी + विमा कंपन्या = पीक विमा घोटाळा
auto driver who helped saif ali khan says not able to work
सैफला रुग्णालयात नेणाऱ्या रिक्षा चालकाने व्यक्त केली नाराजी; म्हणाला, “मी घाबरलोय कारण…”
Malegaon software scam loksatta news
मालेगाव प्रकरणी सॉफ्टवेअर आयातीच्या नावाखाली व्यवहार, अमेरिका, सिंगापूर, यूएईमधील कंपन्यांना कोट्यवधीची रक्कम पाठवली
dhananjay munde vijay wadettiwar
पीक विमा योजनेत भ्रष्टाचार, तत्कालीन कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या निर्णयाची चौकशी करा-वडेट्टीवार

आजरा कारखाना फार मोठ्या अडचणीत आहे. या कारखान्याची आर्थिक घडी विस्कटायची नसेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन निवडणूक बिनविरोध करावी यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. काही घटना अशा घडल्या की एकमेकांचा स्वाभिमान दुखावण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर या निवडणुकीत आमचे राष्ट्रवादीचे पॅनल आहे. आजरा कारखान्याचा परिसर इको सेंसिटिव्ह झोनमध्ये असल्यामुळे तिथे डिस्टीलरी व को- जन उभारण्याला बंदी आहे. ती बंदी काढावी लागेल. त्यासाठी प्रसंगी केंद्रात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना भेटावे लागेल. डिस्टीलरी, इथेनॉल व को-जन हे तिन्ही प्रकल्प केल्याशिवाय तो कारखाना सुरळीत होणार नाही आणि हे करण्याची धमक आमच्यातच आहे, असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला.

Story img Loader