कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात आजही मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी धोका पातळीपेक्षाही दोन फूट अधिक उंचीवरून वाहत आहे. कोल्हापूर, इचलकरंजी महापालिका तसेच अनेक नगरपालिकांच्या नागरी भागामध्ये पाणी घुसत असल्याने पुराची तीव्रता वाढत आहे. जिल्हा, स्तहनिक प्रशासन पूर परिस्थिती नियंत्रण आणण्याच्या प्रयत्नात आहे.

जिल्ह्याला पुन्हा एकदा पुराचा धोका जाणवू लागला आहे. गेल्या पाच दिवसांच्या तुलनेत आज पाऊस पडण्याचे प्रमाण कमी होते. पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच होता. कोल्हापूरात पंचगंगा नदीची पाणी पातळी काल दुपारी ४ वाजता ४३ फूट ४ इंच म्हणजे ४३ फूट या धोका पातळीपेक्षा अधिक होती. ती पहाटे चार वाजता एक फुटाने वाढली होती. तर आज सायंकाळी याचवेळी ४५ फूट ५ इंच पातळी होती. दरम्यान जिल्ह्यातील ९२ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Vegetables expensive due to decline in quality despite increase in income
नवी मुंबई : आवक वाढूनही दर्जा खालावल्याने भाज्या महाग
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Leopard attack on vehicles in Mohol taluka Buldhana
बुलढाणा: धावत्या वाहनांवर बिबट्याचा हल्ला;अर्ध्या तासात दोघे…
heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Land mafia attempts to block bay by dumping debris from demolished buildings in Dombivli West
डोंबिवली मोठागाव खाडी किनारी डेब्रिजचे,भराव टाकून खाडी बुजविण्याच्या हालचाली
Chandrapur Sudhir mungantiwar marathi news
नागपूर : वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांवर वनमंत्री म्हणतात, “उपाययोजना…”

हेही वाचा : “भाजपने हरवले; मग आम्ही त्यांची बी टीम कशी?”, प्रकाश आंबेडकर यांची विचारणा

शहराच्या अनेक नागरिक भागांमध्ये पुराचे पाणी आले आहे. लक्षतीर्थ वसाहत, सुतारवाडा , विन्स रुग्णालय, रमण मळा, रेणुका मंदिर, बापट कॅम्प, कदमवाडी, तावडे हॉटेल अशा १० ठिकाणी पाणी आले आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या व्हीनस कॉर्नर परिसरातील दुकाने जयंती नाल्याचे पाणी पसरल्याने बंद होती. येथे गुडघाभर पाणी साचले होते. अशाच पाण्यातून धोकादायक वाहतूक सुरू होती. असेच चित्र जिल्ह्यात अन्यत्रही आहे. इचलकरंजीतील पुराचे पाणी नागरी भागात वाढत चालले आहे.

हेही वाचा : गावठी पिस्तूल विक्री प्रकरणी कोल्हापुरात एकास अटक

कैद्यांचेही स्थलांतर

वाढत्या पुरामुळे सांगली जिल्ह्यातील ६० पुरुष व २० महिला असे ८० कैदी कोल्हापुरातील कळंबा कारागृहात हलवले आहेत.

वाहतूक कोंडी

पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या सेवा मार्गावर पाणी विस्तारत चालले आहे. तेथेही धोकादायक वाहतूक सुरू आहे. कोल्हापूर – सांगली मार्गावर उदगाव येथे पाणी आल्याने हा मार्ग बंद करण्यात आला.