कोल्हापूर : कोल्हापूर शहरामध्ये शनिवारी पावसाच्या उघडझापीचा खेळ सुरू राहिला. पाणलोट क्षेत्रातील पावसाचे मुसळधार कोसळणे अजूनही सुरूच असल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत अल्पशी वाढ झाली. २८ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुसळधार पावसाचा इशारा कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आला आहे.

या आठवड्याभरात जिल्ह्याच्या पाणलोट भागात मुसळधार पाऊस झाला आहे. पावसामुळे राधानगरी, तुळशी, दूधगंगा, कासारी, कडवी, कुंभी, घटप्रभा, जांभरे, आंबेओहोळ या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी काल सायंकाळी २५ फुटावर आली होती. आजच्या याचवेळी ही पाणी पातळी २५ फूट ८ इंच होती.

heavy rain with lightning damage kharif crops along with grapes in sangli
सांगलीत विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस; द्राक्षासोबत खरीप पिकांचे नुकसान
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Soyabean crop in danger due to rain in Solapur district
सोलापूर जिल्ह्यात जास्तीच्या पावसाने सोयाबीनचे पीक धोक्यात
Dead fish gifted to Chief Engineer of Environment Department
पिंपरी : …अन् पर्यावरण विभागाच्या मुख्य अभियंत्याला दिले मृत मासे भेट
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
Intensity of low pressure area persists over Bay of Bengal
बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची तीव्रता कायम
Sakkardara lake, Nagpur, unsafe,
नागपूरच्या प्रसिद्ध सक्करदरा तलाव परिसर सर्वसामान्यांसाठी असुरक्षित, काय आहेत कारणे?
dam overflow due to heavy rain
अबब! सात धरणं तुडुंब तर उर्वरित १०० टक्क्यांकडे…विक्रमी जलसाठा

हेही वाचा : वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय कचरा उघड्यावर; कोल्हापूर महापालिकेने केला ५० हजाराचा दंड

अधिकाऱ्यांचा वावरातील वावर

पावसाची संततधार कायम असल्याने शेती कामाला गती आली आहे. जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये भात पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. त्यामुळे या राधानगरी तालुक्यातील सावर्डे पाटणकर या गावांमध्ये कृषी अधीक्षक अरुण भिंगारदिवे व सहकार्यांनी चार सुत्री भात लागवड प्रात्यक्षिक केले. शेतकऱ्यांप्रमाणे सराईतपणे चिखलात, उभ्या पावसात शेतकरीपुत्र असलेल्या अधिकाऱ्यांनी लागवड केल्याने शेतकऱ्यांनीही त्यांचे कौतुक केले.