कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज सकाळी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूर येथे रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी स्वाभिमानीचे पदाधिकारी, प्रमुख कार्यकर्ते यांची रातोरात धरपकड चालवली आहे. अनेक पोलीस ठाण्यामध्ये स्वाभिमानीचे कार्यकर्ते दाटीवाटीने बसल्याचे दिसत आहे. तर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काही वेळात रास्ता रोको सुरू होणारच, असे पक्षाच्यावतीने सांगण्यात आले.

ऊस दरासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन सुरू केले आहे. मागील हंगामासाठी प्रति टन ४०० आणि यावर्षी एक रकमी साडेतीन हजार रुपये उचल मिळावी यासाठी आंदोलन सुरू आहे. याबाबत जिल्हा पातळीवर तीन बैठका झाल्या होत्या. तर काल सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊनही तोडगा निघाला नाही.

thief escapes police custody
पोलीस दरोडेखोराला घेऊन ‘स्पा’मध्ये गेले, ‘मसाज’चा आनंद लुटत असताना चोर झाला पसार
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Pune, Crime, Cop-24 , Police Patrol,
पुणे : रस्त्यांवरील गंभीर गुन्हे रोखण्यासाठी ‘कॉप – २४’, पोलिसांकडून आता अहोरात्र गस्त; ७२६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती
Torres Scam Case, High Court, police, Torres Scam,
टोरेस घोटाळा प्रकरण : कार्यतत्परतेत पोलिसांकडून कसूर, पोलिसांच्या भूमिकेवर उच्च न्यायालयाचे पुन्हा ताशेरे
Crime Branch and Vitthalwadi Police arrested two Bangladeshis in Ulhasnagar news
उल्हासनगरात आणखी दोन बांगलादेशी पकडले,गुन्हे शाखा आणि विठ्ठलवाडी पोलिसांची कारवाई
pimpri chinchwad police commissioner vinay kumar choubey on illegal money lending
पिंपरी : अवैध सावकारी करणाऱ्यांवर आता कठोर कारवाई; पोलीस आयुक्तांचा आदेश
traffic police officer Gave Punishment to bus driver
जशास तसे उत्तर! विनाकारण हॉर्न वाजविणाऱ्याला बससमोर गुडघे टेकून बसवलं आणि मग… पाहा ट्रॅफिक पोलिसांचा व्हायरल VIDEO

हेही वाचा : कोल्हापूरात उसदराची कोंडी फोडली  गुऱ्हाळघराने; मागील १०० रुपये देण्यास मान्यता, कारखान्यांचा मुद्दा लटकलेलाच

त्यानंतर राजू शेट्टी यांनी आज राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन करणार असल्याचा पुनरुच्चार केला होता. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन पोलिसांनी काल रात्रीपासून स्वाभिमानीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांची धरपकड सुरू केली आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्यात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कार्यकर्त्यांमुळे पोलीस ठाण्यांमध्ये गर्दी झालेली आहे.

हेही वाचा : ऊस प्रश्नावर तोडगा निघणार? बुधवारी मंत्रालयात बैठक, राजू शेट्टी यांना निमंत्रण

राजू शेट्टी थोड्याच वेळात कोल्हापूरकडे रवाना होत आहेत. कोल्हापुरात श्री करवीर निवासिनी अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन साखर कारखानदार व विरोधी पक्षासह सरकारला सुबुध्दी मिळो, असे अंबामातेकडे साकडे घालून पंचगंगा पुलावर चक्काजाम आंदोलन सुरू करणार आहेत, असे मध्यवर्ती कार्यालय, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी सांगितले.

Story img Loader