कोल्हापूर : मागील हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन दुसरा हप्ता ४०० रूपये व यावर्षी पहिली उचल ३५०० रूपये द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने उद्या रविवारी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील संपूर्ण ऊस पट्ट्यामध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

ते म्हणाले की, १३ सप्टेंबर पासून ऊस दरासाठी आमचे आंदोलन सुरू आहे. ७ नोव्हेंबर पर्यंत आक्रोश पदयात्रा काढण्यात आली. ऊस परिषद झाल्यानंतर १५ नोव्हेंबर पर्यंत जयसिंगपूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले. ऊस दरासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका होऊनही ऊस दराचा प्रश्न निकाली निघालेला नाही. आमच्या मागण्या मान्य झालेल्या नसल्याने हे चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.

Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Electricity system Maharashtra, strike employees,
राज्यातील वीज यंत्रणा कोलमडणार! कर्मचाऱ्यांनी पुन्हा उगारले संपाचे अस्त्र
Goshalas, Maharashtra, Goshalas subsidy,
राज्यातील १३५ गोशाळांना झाली मोठी मदत; जाणून घ्या, राज्य सरकारने किती गोशाळांना दिले अनुदान
kolkata doctor rape case trinamool congress vs bjp controversy more intense after sc comment
सुनावणीनंतर राजकीय वाद; निदर्शनांमागे केंद्राचे कारस्थान बॅनर्जी; चेहरा उघड झाल्याची भाजपची टीका
uddhav thackeray latest marathi news,
“सरकार उलथून टाकण्यासाठी एकत्र या”, उद्धव ठाकरे यांचे सरपंचांना आवाहन
chhatrapati Shivaji maharaj statue at Rajkot fort Malvan
मालवण राजकोट किल्ल्यावर नौदल अधिकारी, कोसळलेल्या शिव पुतळ्याची केली पाहणी
badlapur case protest mahavikas aghadi
राजकीय पक्षांना बंद पुकारण्याचा अधिकार आहे का? बदलापूर प्रकरणातील बंदविरोधात न्यायालयाने काय निर्णय दिला?

हेही वाचा : “राज्यात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या छगन भुजबळ यांना मुख्यमंत्र्यांनी रोखावे”, मनोज जरांगे पाटील यांची मागणी

शेट्टी हातकणंगलेत

कोल्हापूर जिल्ह्यात १५ ठिकाणी रास्ता रोको होणार आहे. मी स्वतः हातकणंगले येथे रस्त्यावर उतरणार आहे. सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे, बीड, लातूर, नंदूरबार, नांदेड, परभणी आदी जिल्ह्यांसह संपूर्ण ऊस पट्ट्यात चक्का जाम आंदोलन होणार आहे. राज्य सरकारला ऊस दरावर चर्चा करण्यास वेळ नाही. आम्ही शेतकऱ्यांसाठी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहोत. कर्नाटक सीमाभागातही आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. आमच्या मागण्या पूर्ण होत नाही. तोपर्यंत ऊस तोड आम्ही सुरू करू देणार नाही. यानंतर आंदोलनाचा टप्पा अधिक उग्र होणार असल्याचा इशारा शेट्टी यांनी दिला.