कोल्हापूर : मी कोणत्याही सहकारी संस्थेचा साधा संचालकही नाही. हाडाचा शेतकरी आहे. अशावेळी राजू शेट्टी यांनी मला साखर कारखानदाराचा मोहरा म्हणणे चुकीचे आहे असे मत ठाकरे सेनेचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सत्यजित पाटील सरूडकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी काल सत्यजित पाटील यांना साखर कारखानदारांचे प्रतिनिधी ठरवले होते. त्यांचे वडील कारखान्याचे उपाध्यक्ष आहेत. माझ्यासारख्या शेतकरी नेत्याचा पराभव करण्याच्या हालचाली कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखानदाराकडून सुरू आहेत, असा आरोप त्यांनी केला होता.

Harshvardhan Patil Chief Minister Tamil Nadu M.K.Stalin Chennai sugar industry
हर्षवर्धन पाटील व तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन यांची भेट, चेन्नई येथील भेटीत साखर उद्योगावर संवाद
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Sugar Commissionerate is committed to go above and beyond to ensure human rights of sugarcane workers
ऊसतोड कामगारांना मानवी हक्क मिळवून देण्यासाठी कटिबद्ध, साखर आयुक्त कुणाल खेमनर यांची ग्वाही
nana patole criticized bjp and the prime minister excel at staying in limelight through events
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले, ” मोदींना ‘इव्हेंट’ करण्याची सवय जडली”
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
Sanjay Raut Ajit Pawar (1)
“अजित पवारांना आता मुख्यमंत्री व्हायचं नाही, कारण…”, संजय राऊतांची स्तुतीसुमने; नेमकं काय म्हणाले?
devendra bhuyar marathi news
अजित पवारांच्या पक्षाचा माजी आमदार म्हणतो, “अर्थसंकल्प भ्रमनिराश करणारा!”
Nana Patole on Ravindra Dhangekar
Nana Patole: रवींद्र धंगेकर काँग्रेसचा हात सोडणार? प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, “काही लोक व्यावसायिक…”

हेही वाचा : सांगलीतील नाराजीचा हातकणंगलेत परिणाम नाही; ‘मविआ’च्या नेत्यांचा निर्वाळा

याला उत्तर देताना माजी आमदार सत्यजित पाटील म्हणाले, माझे घराणे राजकीय आहे. मी चार विधानसभा निवडणुका लढल्या आहेत. आता पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आलो आहे. मी कोणत्याही सहकारी संस्थेत साधा संचालक नाही.साखर कारखानदारी नसती तर महाराष्ट्राचा विकास झाला नसता. कारखानदार हे काही समाजाचे शत्रू नाहीत. राजू शेट्टी यांना देखील आम्ही शत्रू मानत नाही. माझी नाळ सर्वसामान्य जनतेशी जुळलेली असल्याने या निवडणुकीत मी जनतेचा प्रतिनिधी म्हणून उतरलो आहे.

हेही वाचा :

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडावेळी मी गोव्याला गेल्याचा राजू शेट्टी यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असा उल्लेख करून पाटील म्हणाले, मुळात मी कोणत्याही सभागृहाचा सदस्य नाही. माजी आमदारांना मताचा अधिकार नसतो हे शेट्टी यांना माहित आहे. माझी निष्ठा पक्की असल्याने विरोधी गटातील माझ्या मित्रांनी मला ऑफर देण्याचे धाडस दाखवले नव्हते. सरकार आणि सामान्य माणूस यांच्यातील एक चांगला दुवा होणे हेच माझे मुख्य उद्देश आहे.

Story img Loader