कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे दोन दिवस उरले असताना निकाल नेमका कसा लागणार याची उत्सुकता वाढली आहे. निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याची चौका चौकात, गावगाड्यात गप्पांचा फड रंगला असून मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत.

कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघात जिल्ह्यात मतदान होऊन तीन आठवडे झाले. निकाल जवळ येईल तशी याच विषयाभोवती अहोरात्र चर्चा फिरत आहे. चहाचे गाडे, बाजारहाट, कार्यालय, गप्पा मारण्यासाठी जमायचे ठिकाण अशा सर्व ठिकाणी निकाल कसा असणार याचेच मोठे कुतूहल आहे.

ajit pawar silence on udgir
उदगीर जिल्हा निर्मितीसाठी मंत्र्याच्या मागणीनंतरही अजित पवारांचे मौन
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Campaigning ends for final phase of J-K Assembly elections
जम्मूकाश्मीरमध्ये प्रचाराची सांगता ; अखेरच्या टप्प्यासाठी उद्या मतदान, प्रचारसभेत काँग्रेस अध्यक्षखरगेंची प्रकृती बिघडली
Yuva Sena is celebrate with the victory in the Adhi Sabha elections print politics news
अधिसभा निवडणुकीच्या विजयाने युवासेनेत उत्साह
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
Election Commissioner rajiv kumar Meetings to review assembly election preparations
निवडणूक आयुक्त मुंबईत; विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी बैठका
Amit Shah on two days tour of the state print politics news
अमित शहा आजपासून दोन दिवस राज्याच्या दौऱ्यावर; मोदी गुरुवारी पुण्यात
Marathwada bjp amit shah marathi news
मराठवाड्यात भाजपने कंबर कसली, अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये आज पदाधिकाऱ्यांची बैठक

हेही वाचा – रंकाळा तलावात पुन्हा मृत माशांचा खच; कोल्हापूर महापालिका यंत्रणा सुस्तच

पैजा जपूनच

दुसरीकडे सट्टा बाजारात कोणाला काय भाव आहे याचाही अंदाज घेतला जात आहे. त्यातूनच उमेदवार कोणता उमेदवार निवडून येणार यावरून मोठ्या रकमेच्या पैजा लागल्या आहेत. एका लाखाच्या पैजेवर कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे अशा स्वरुपाच्या पैजा लागत असल्या तरी त्याची चर्चा होणार नाही याची काळजी घेतली जात आहे.

हेही वाचा – जागतिक दूध दिन: दुधाळ जनावरांच्या तब्बेतीची देखभाल करणारा प्रकल्प इचलकरंजीतील विद्यार्थ्यांकडून विकसित

उमेदवारांना धाकधूक

जिल्ह्यात याही वेळी मतदानाची टक्केवारी वाढली आहे. ७० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले असल्याने वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर या चर्चेला तोंड फुटले आहे. त्याचे वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात असल्याने महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्येही धाकधूक निर्माण झाली आहे.