कोल्हापूर : महाराष्ट्र – कर्नाटक राज्यांना जोडणाऱ्या खिद्रापूर – जुगुळ या कृष्णा नदीवरील पुलाच्या रस्त्याच्या कामास त्वरित सुरुवात करावी. अन्यथा आठ दिवसांत ग्रामस्थांसह अन्नत्याग आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन मुनी उत्तम सागर महाराज यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिला. कर्नाटक व महाराष्ट्र राज्याला खिद्रापूर – जुगुळ हा महत्वाचा पुल आहे. तत्कालीन खासदार प्रकाश हुक्कीरे यांनी २०१७ साली २० कोटी ८५ लाख रुपये खर्चाच्या या पुलास मंजुरी मिळवली आहे. कर्नाटक हद्दीतील रस्ते व पूल याचे बांधकाम तयार करण्यात आले आहे. या रस्त्याचे व भराव्याचे काम कर्नाटक शासन करणार आहे. हा पूल २४७ मीटर लांब व ११ मीटर रुंदीचा आहे.

भूसंपादनाचा अडसर

महाराष्ट्र हद्दीतील खिद्रापूर गावाजवळील जमीन भूसंपादन करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाला ८० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. खिद्रापूर हद्दीतील भराव व रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू करण्यात आले नाही. या भागातील शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी शेतजमीन देण्यास तयार असताना देखील त्यांची रक्कम दिली नसल्याने भूसंपादन करता आले नाही. वारंवार मागणी करूनही या भागातील खासदार, आमदार व अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे.

kajol sister tanisha on working woman
“महिलांनी मुलांच्या संगोपनासाठी घरी राहावं”, अभिनेत्री काजोलच्या बहिणीचे वक्तव्य; म्हणाली, “माझी आई आमच्याजवळ…”
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Tejaswini Pandit
“माझ्या बालमित्राने मला…”, सुंदर साडीतील फोटोंमध्ये तेजस्विनी पंडितची खास पोस्ट; म्हणाली, “माझं न संपणारं प्रेम…”
New Guardian Minister Ajit Pawar is visiting Beed tomorrow
उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या बीडमध्ये
Tejshree Pradhan
“जे हक्काचे…”, तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ मालिका सोडल्यावर काय करतेय? म्हणाली, “आताच्या घडीला…”
What Varsha Gaikwad Said?
Varsha Gaikwad : “कुर्ला भागातील मदर डेअरीची जमीन गौतम अदाणींच्या घशात…”; खासदार वर्षा गायकवाड यांचा आरोप
Adar Poonawala News
Aadar Poonawala : अदर पूनावालांचं वक्तव्य, “आठवड्याला ७० तास काम कधीतरी ठीक आहे; पण कायम नाही कारण.. “
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”

हेही वाचा : महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी ४० कोटी मंजूर – हसन मुश्रीफ

महापुरात उपयुक्त

कृष्णा नदीकाठचा हा भाग अतिमहापुरात सापडणारा आहे. हा पूल पूर्णत्वास आल्यास महापूर काळात राजापूर, राजापूरवाडी, खिद्रापूर, मिरज यासह महाराष्ट्रातील अन्य गावातील लोकांना याचा उपयोग होणार आहे. तसेच कर्नाटकातील बेळगाव , कागवाड अथनी, चिकोडी शिरगुपी हा मार्ग जवळचा होणार असून पैशाची व वेळेची बचत होणार आहे. तसेच, या पुलामुळे विजापूर – कोल्हापूर हा राज्य मार्ग असा उन्नत दर्जा प्राप्त होणार आहे, असेही उत्तम सागर मुनी महाराज यांनी सांगितले.

Story img Loader