लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : काळम्मावाडी नळ पाणी योजनेचे पाणी मी पालकमंत्री असताना शहरात आले ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. या पाण्याचे श्रेय कोण्या व्यक्तीचे नाही तर कोल्हापूरच्या जनतेचे आहे. या योजनेसाठी तत्कालीन उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी निधी दिल्याने त्यांचे आभार मानले पाहिजेत. कोल्हापूरकरांचे स्वप्न साकारल्यानंतर काळम्मावाडी योजनेचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते साजरा करण्यात येणार आहे, असे मत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी रविवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

cm Devendra fadnavis cancelled schemes
शिंदेंच्या काळातील योजनांना कात्री? आर्थिक संतुलनासाठी सरकारचा विचार
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
interest free loan, Center , states, benefit ,
केंद्राकडून राज्यांना १.११ लाख कोटींचे बिनव्याजी कर्ज, २०२३-२४ मध्ये सर्वाधिक फायदा कोणत्या राज्यांना जाणून घ्या… 
Maharashtra Disaster Management Authority Mahayuti govt
महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणात एकनाथ शिंदेंऐवजी अजित पवारांची निवड; महायुतीत नाराजी कायम?
Eknath Shinde aims to make thane the number one city in few years
एकनाथ शिंदेंच्या वाढदिवसाला संगीताचा नजराणा, लोकनाथ – एकनाथ, अनाथांचा नाथ एकनाथ गाणी पुन्हा प्रकाशझोतात
mhada lottery draw results today in presence of dcm Eknath Shinde
म्हाडाच्या २२६४ घरांसाठी आज सोडत; दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ठाण्यात कार्यक्रम
Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
Eknath Shindes statement said beloved brother is bigger than post of Chief Minister or Deputy Chief Minister
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीपदापेक्षा लाडका भाऊ मोठा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विधान

काळमावाडी धरणातील नळ पाणी योजनेचे दिवाळीत पाणी येणार असे विधान यापूर्वीच पालकमंत्री मुश्रीफ यांनी केले होते. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणी आल्याबद्दल आनंद व्यक्त करून त्यांनी या योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. तसं कोणाला वाटत असेल तर चौकशी करू. या योजनेचे काम निधी अभावी कधीही बंद पडले नाही.

आणखी वाचा-…तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही; राजू शेट्टींचं आवाडेंना प्रत्युत्तर

श्रेयवादाची किनार

आमची राजकीय भूमिका बदलली आहे. त्यामुळे आम्ही पाणी योजनेचे श्रेय घेऊ असे वाटले असल्याने त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला असावा, अशी टीका पालकमंत्री मुश्रीफ यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांना उद्देशून केली.

ठाकरे; जयंतरावांचा समाचार

अजित पवार हात एक बाहेर एक असे वागत नाही,असे म्हणत मुश्रीफ यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. मराठा समाजाला आरक्षण मिळावे पण ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये असे छगन भुजबळ यांचे म्हणणे आहे. जातीनिहाय जनगणना झाल्यानंतर सत्य काय ते समोर येईल, असेही मुश्रीफ म्हणाले. खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचा आहे. प्रतिज्ञापत्र खरे की खोटी हे बोलण्याचा अधिकार कोणत्याही नेत्याला नाही तर तो निवडणूक आयोगाला आहे, असा टोला त्यांनी जयंत पाटील यांना लगावला.

Story img Loader