कोल्हापूर : धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने जिल्ह्यातील नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीमध्ये दिवसभरात एक फूट पाणी वाढले आहे. ७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.धरण क्षेत्रात पावसाची गती कायम राहिली आहे. जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. पश्चिमेकडील शाहूवाडी, गगनबावडा, भुदरगड या तालुक्यांमध्ये पाऊस जोरदार पडत आहे. पूर्वेकडील भागात पावसाची उघडझाप आजही कायम राहिली आहे.

जीवघेणी वाहतूक

जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. बंधारे पाण्याखाली गेल्यानंतर तेथे वाहतूक करू नये अशा सूचना आहेत. तरीही जीव धोक्यात घालून वाहनधारक बंधाऱ्यावरील पाण्यात वाहने घालत आहेत.पंचगंगा नदीचे पाणी पातळी सोमवारी सायंकाळी १८ फूट ४ इंच होती. शिंगणापूर ,राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड आणि कासारी नदीवरील असे सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणातून १०० क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 

Kolhapur kalammawadi dam
कोल्हापूर: वर्षा सहल बेतली जीवावर; काळम्मावाडी धरणक्षेत्रात बुडून दोघांचा मृत्यू
water level of Panchganga river has increased by three feet in the last two days
पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; पावसाची उघडझाप
Hathras Stampede What Exactly happened
Hathras Stampede : “गुरुजींची कार मंडपातून निघाली, अन् लोकांनी…”, पीडिताने सांगितली आपबिती; हाथरसमध्ये नेमकं काय घडलं?
passenger dies in metro station in pune after falling down on escalator
मेट्रो स्थानकात प्रवाशाचा मृत्यू; सरकत्या जिन्यावरून उतरताना घटना; पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
katyayani temple Kolhapur
कोल्हापुरातील कात्यायनी मंदिरात पुन्हा चोरी
big leaders, Ajit Pawar group,
अजित पवार गटाचे दोन बडे नेते शरद पवार यांच्या भेटीला; कोल्हापुरात खळबळ
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”