कोल्हापूर : करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरातील मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. त्यामुळे ही मूर्ती बदलण्यात यावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेने उपजिल्हाधिकारी संपत खिलारे यांच्याकडे शुक्रवारी करण्यात आली.

साडेतीन शक्तीपीठांपैकी एक शक्तीपीठ म्हणजे कोल्हापूरची श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी आहे. होय. देवीच्या दर्शनासाठी देशासह परदेशातून दररोज हजारो भावीक येत असतात. दैनंदिन पूजा, अर्चा आणि अभिषेक यामुळे देवीच्या मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाली आहे. या मूर्तीवर बऱ्याच वेळा रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आल्याने मूर्तीच्या काही भागाची बऱ्याच प्रमाणात झीज झाली असून मूर्तीचे मूळ रूप बदलले आहे.

Rasta Roko movement of Shivpremi in Kolhapur
कोल्हापुरात शिवप्रेमींचे रास्ता रोको आंदोलन
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
Gangster Sham Lakhe beat up four children for extortion
गुंड शाम लाखे याची खंडणीसाठी चार मुलांना मारहाण; थरकाप उडवणाऱ्या व्हिडिओने खळबळ
Rape case Story
१२ व्या वर्षी गँगरेप, १३व्या वर्षी मातृत्त्व; २४ वर्षांनी त्याच मुलाने आईचे पांग फेडले, नराधमांना शोधून घेतला बदला!
farmers are happy as increase in tomato prices
टोमॅटो दरात वाढ, उत्पादक शेतकऱ्यांचे चेहरे फुलले
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Job appointment letter and death of father prospective teacher experienced two extreme opposite situation
नोकरीचे नियुक्ती पत्र अन् पित्याचे निधन; भावी शिक्षकाने अनुभवले घटकेत दोन टोकाचे प्रसंग

आणखी वाचा-टोमॅटो दरात वाढ, उत्पादक शेतकऱ्यांचे चेहरे फुलले

याबाबत पुरातत्व खात्यानेही अहवालात गंभीर मुद्दे नमूद केले आहेत. ही स्थिती लक्षात घेवून जिल्हा प्रशासनानं श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती बदलून या ठिकाणी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, अशी मागणी कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष जाधव, उपाध्यक्ष सरदार जाधव, अशोकराव जाधव, अनिल पाटील, लता सोमवंशी, शालिनी सरनाईक आदींनी केली आहे.