कोल्हापूर : लोकशाहीमध्ये आपापल्या उमेदवारांचा प्रचार करण्याची सर्वांनाच मुभा आहे. कोणी जाणीवपूर्वक आमच्या आडवे येत असेल तर मी सुद्धा याच मातीत २५ वर्षे कसलेला पैलवान आहे. कोणाला कसे चितपट करायचे हे चांगलेच माहिती आहे. कोणत्याही बारक्या कार्यकर्त्यांनी माझ्या आड येण्याचे धाडस करू नये, असा इशारा कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी दिला. महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचाराची सभा वडणगे (ता. करवीर) येथे झाली. यावेळी आमदार पाटील बोलत होते.

ते म्हणाले, कोल्हापुरात गोळीबाराच्या घटना घडत आहेत. भाजपच्या सरकारमध्ये कायदा सुव्यवस्थेची अवस्था बिकट झाली आहे. महाराजांच्या सभांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने आपली तटबंदी मोडायचा प्रयत्न होईल. कोणी त्रास देत असेल तर मला सांगा. रात्री बारा वाजता काठी घेऊन तेथे यायला बंटी पाटील तयार आहे.

Ajit Pawar On Raigad DPDC Meeting
Ajit Pawar : महायुतीत धुसफूस? ‘डीपीडीसी’च्या बैठकीला शिंदेंचे आमदार गैरहजर; अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “कोणत्याही आमदारांना…”
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Pankaja Munde
Pankaja Munde : वेगळा पक्ष काढण्याच्या विधानावर पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण; म्हणाल्या, “त्या विधानाचा अर्थ…”
Image Of Ajit Pawa
“महायुतीच्या बातम्या नीट द्या नाहीतर…”, हातात AK47 घेत अजित पवारांची मिश्किल टिप्पणी
Will not be forgiven if entrepreneurs are troubled says Devendra Fadnavis
उद्योजकांना त्रास झाल्यास क्षमा केली जाणार नाही… मुख्यमंत्र्यांनी कुठल्या नेत्यांना दिला इशारा!
controversial referee decision at maharashtra kesari event
अन्वयार्थ : कुस्तीच चितपट होऊ नये यासाठी…!
Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
Karnataka Congress differences news in marathi
कर्नाटक काँग्रेसमधील मतभेद उघड ; मुख्यमंत्र्यांच्या राजकीय सल्लागाराचा राजीनामा

हेही वाचा : कोल्हापुरात औद्योगिक विकासासाठी उद्योगासाठी ६५० हेक्टर जमीन उपलब्ध करणार – उदय सामंत

हीच का मोदी गॅरेंटी ?

विरोधक पदयात्रा घेऊन भागात येतील. तेव्हा त्यांच्यासमोर सिलेंडरचा गॅस ठेवून ४०० रुपयांची किंमत १२०० रुपये कशी झाली, हीच कामे मोदी गॅरेंटी आहे का? असा प्रश्न त्यांना विचारावा, असे आवाहन सतेज पाटील यांनी उपस्थित महिलांना केले.

Story img Loader