कोल्हापूर : साखरेची किमान आधारभूत किंमत आणि इथेनॉलचे दर वाढवावेत अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी शनिवारी नवी दिल्लीत केंद्रीय अन्न वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन केली. त्यासाठी महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ आणि इस्माच्यावतीने जोशी यांना मागणीचे पत्र देण्यात आले.

सन २०१८-१९ पासून आतापर्यंत साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ झालेली नाही. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार अजूनही साखरेला प्रतिक्विंटल ३१०० रुपये इतकाच किमान आधारभूत दर आहे. गेल्यावर्षी उसाची किमान एफआरपी ३१५० रुपये होती. यंदा ती वाढली जाणार आहे. साखरेचा उत्पादन खर्च आणि उसाची किंमत (एफआरपी )यांचा विचार करता साखर कारखान्यांचे आर्थिक गणित बिघडलेले आहे. त्यामुळे साखरेच्या किमान आधारभूत किमतीमध्ये वाढ ३१०० रुपयांवरून ती ४२०० रुपये प्रतिक्विंटल इतकी करावी, अशी मागणी जोशी यांच्याकडे करण्यात आली आहे.

शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Viral Video
Viral Video : “प्रत्येक गुजराती एलॉन मस्क आहे”, कॅनडामध्ये वीज बचतीचा ‘देसी जुगाड’ पाहून नेटकरी हैराण
Rajarambapu Patil Cooperative Sugar Factory will provide 2 5 lakh sugarcane seedlings to farmers
राजारामबापू कारखाना शेतकऱ्यांना २५ लाख ऊसरोपे पुरवणार
Nutrition Diet , Maharashtra School, Sweet Food ,
पोषण आहार बदल! साखर लोकांना मागा पण गोडधोड खाऊ घाला, अनुदान नाहीच
central government raised purchase price of ethanol from C heavy molasses to Rs 57 97 per liter from Rs 56 58
इथेनॉल खरेदीच्या दरवाढीचे गाजर जाणून घ्या, केंद्र सरकारच्या निर्णयावर साखर उद्योग नाराज का
india sugar production declines by 2 million tonnes
देशांतर्गत साखर उत्पादनात २० लाख टनांची घट; घट ४० लाख टनांवर जाण्याची भीती
How much sugar has been produced in Maharashtra and how much will be produced Mumbai print news
राज्याने साखर उत्पादनाचा महत्त्वाचा टप्पा गाठला; जाणून घ्या, साखर उत्पादन किती झाले, किती होणार 

हेही वाचा : बेळगावात ९ डिसेंबरला मराठी भाषकांचा महामेळावा, कर्नाटक अधिवेशनावेळी संघर्षाची सलामी

सन २०२३-२४ या वर्षात देशात साखरेचा तुटवडा निर्माण होण्याच्या शक्यतेने केंद्र सरकारने साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीला बंदी घातली. आता ती उठवली असली तरी इथेनॉलच्या दरातही वाढ करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Story img Loader