कोल्हापूर : रविवार आणि पाऊस हे समीकरण आजही कायम राहिले गेले. जिल्ह्यात पाणलोट क्षेत्रामध्ये धुवाधार पाऊस पडत आहे. राधानगरी धरण भरण्यास १० फूट अंतर राहिले असल्याने नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने आज सायंकाळी अतिदक्षतेचा इशारा दिला होता.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर आजही कायम राहिला. पावसाची संततधार सुरू असल्याने सलग तिसऱ्या रविवारी कोल्हापूरकरांना घरातच दिवस घालवावा लागला. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. राजाराम बंधाऱ्यांमध्ये ३७ फूट पाणी पातळी झाली असून ती इशारा पातळीस दोन फूट अंतर राहिले आहे. इचलकरंजी येथे पंचगंगा नदीची पाणी पातळी सायंकाळी ६१ फूट ५ इंच होती. धोका पातळी ७१ फूट आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Panvel municipal corporation Inaugurates development works Chief Minister devendra fadnavis
पनवेलमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विकासकामांचे लोकार्पण
Maharashtra hailstorm loksatta news
उत्तर महाराष्ट्रात गारपीट, हलक्या पावसाची शक्यता, जाणून घ्या हवामान विषयक स्थिती आणि इशारा
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Review, Blue Red Flood Lines, Mula-Mutha River,
पुणे : नदीपात्राची निळी रेषा, लाल रेषा बदलणार?
Replantation of 2097 trees for Thane Municipal Headquarters
६३१ वृक्ष तोडण्याचा प्रस्ताव; ठाणे महापालिका मुख्यालयासाठी २०९७ वृक्षांचे पुनर्रोपण

हेही वाचा – कोल्हापूर : नृसिंहवाडीतील दत्त मंदिरात दुसरा दक्षिणद्वार सोहळा; भाविकांनी केले पवित्र स्नान

हेही वाचा – कोल्हापुरात भर पावसातही गुरुपौर्णिमेचा उत्साह; नृसिंहवाडीत रीघ

दरम्यान राधानगरी धरणातही पाणीसाठा वाढत चालला आहे. येथे पाणी पातळी ३३८ फूट होती. ३४७ फूट पाणी पातळी झाल्यानंतर धरण पूर्ण क्षमतेने भरते. आणखी दहा फूट पाणी पातळी वाढल्यास एखादा दरवाजा उघडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील ७९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
शाहूवाडी तालुक्यात सर्वाधिक ५८ मिमी पाऊस पडला. याशिवाय पन्हाळा २९, राधानगरी २९.४, गगनबावडा ३५.६ ,भुदरगड ४१.४, आजारा ४१, चंदगड ३६ मिमी येथेही जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यातील सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. सायंकाळी चार वाजता पुढील तीन तास अतिवृष्टी होण्याचा इशारा प्रशासनाने दिला होता.

Story img Loader