कोल्हापूर

गेल्या काही दिवसांपासून विविध आजारांनी ग्रस्त असलेले भारताचे पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर योग्य प्रकारे चांगले उपचार व्हावेत, या करिता राज्य शासनाच्या क्रीडा विभागाकडून त्यांना पाच लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. आमदार ऋतुराज पाटील यांनी क्रीडामंत्री सुनिल केदार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर खंचनाळे यांच्या रूग्णालयातील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाचा विचार करता राज्य शासनाकडून त्यांना मदत करण्यात आली.

Girish Mahajan, High Court, Girish Mahajan news,
मंत्री गिरीश महाजनांवर उच्च न्यायालयाची नाराजी, काय आहे प्रकरण?
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Dangerous schools of Raigad Zilla Parishad continue
रायगड जिल्हा परिषदेच्या धोकादायक शाळा सुरूच
MPSC, MPSC examinees, MPSC latest news,
स्पर्धा परीक्षार्थींना दिलासा… राज्य शासनाकडून ते’ परिपत्रक रद्द
revised pension to maharashtra government employees proposal in state cabinet meeting today
कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तिवेतन; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव
mahayuti, Abdul Sattar, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, state level events, agriculture festival, political power
माझा मतदारसंघ, ‘राज्यस्तरीय’ कार्यक्रमांची माझीच जबाबदारी, विविध महोत्सवांचा मंत्र्यांकडून पायंडा
Parliamentary panel on Waqf Bill
वक्फ मंडळेच रद्द करा! संसदीय समितीत ‘रालोआ’ सदस्याची मागणी
finance department is always keeping track of jurisdictional files says high court
‘वित्त विभाग फाईलवर ठाण मांडून बसतो’ उच्च न्यायालयाचा संताप…

पहिले हिंदकेसरी खंचनाळे यांच्यावर कोल्हापुरात खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विविध व्याधींनी ग्रस्त असल्यामुळे वारंवार त्यांची प्रकृती चिंताजनक होत आहे. त्यांच्यावर योग्य उपचार व्हावेत, याकरता राज्य शासनाने मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या उपचाराकरिता क्रीडा व युवा सेवा संचालनालयातर्फे राज्य क्रीडा विकास निधीतून पाच लाखांचा धनादेश मंजूर करण्यात आला आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार व क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री सतेज पाटील यांचे सहकार्य लाभले, असे आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले.